Skip to main content

मी प्रतिमा,माझी प्रतिमा हा कवयित्री प्रतिमा काळेचा समीक्षणासाठी सप्रेम भेट दिलेला

मी प्रतिमा,
माझी प्रतिमा 
हा कवयित्री प्रतिमा काळेचा समीक्षणासाठी सप्रेम भेट दिलेला 
कविता संग्रह संपूर्ण वाचला.
समीक्षा पब्लिकेशन्स पंढरपूर ने प्रकाशित केलेला व संतोष घोंगडेंनी मुखपृष्ठ चितारलेला हा कविता संग्रह नितांतसुंदर झाला आहे. नवकवयित्रिचा पहिलाच कविता संग्रह आहे.त्या पेशाने शिक्षिका असल्या तरीही त्या उत्तम निवेदिका व संचलनकर्त्याही आहेत.
चला धम्म आचरणात आणू 
या कवितेत कवयित्री म्हणते,
धर्म जातिभेद विसरून,
प्रेमाची मशाल घेऊन 
भूमीवर समृध्दी आणण्यास 
बुध्द नव्याने घेवू समजावून जणू
चला धम्म आचरणात आणू..
या कवितेत जातिभेद विसरून,बुध्द नव्याने समजावून घेऊन धम्म आचरणात आणण्याचा मनोदय व्यक्त करते.
माझे बाबा,या कवितेत ती वडिलांच्या विषयी आदरभाव व्यक्त करताना म्हणते 
बाबा सुगंधी कस्तुरी 
खोल मायेचा सागर 
विचारांनी आयुष्यात 
भरी प्रेमाची घागर!!

श्रावण कविता तर श्रावणमासी हर्ष मानसी,ह्या कवितेची आठवण करून देते.
प्रेमाला देई उभारी निसर्ग,
नागपंचमी सण,श्रावण.
माहेरवाशीण माहेराला, 
येईल आनंदाला उधान!!
प्रितीचा गुलमोहर ही एक नितांतसुंदर कविता आहे.
प्रेम सागरात भिजताना 
तुझ्या आठवणीत जगते 
प्रेमळ उबदार मिठीत 
गुलमोहर प्रीतीचा फुलवते.
हि एक मिठीत किती मिठास आहे,असेच प्रितीचा गुलमोहर सांगते.
प्रेमाचा दरवळ या कवितेत कवयित्री म्हणते,
गंधित करी मजसी निरंतर,
आठवणीचा असा परिमळ.
सुगंध भरून र्हदयात आज,
चोहीकडे प्रेमाचाच दरवळ 
असा आठवण,एक साठवण चा 
सुगंध र्हदयालाही गंधित करतो.
नवी वाट हि कविता ही अप्रतिम आहे.
तुझ्या प्रेमात डुंबता
गुंफताना छान वेणी,
कातरवेळेला होते,
तगमग जीवघेणी.
हि तगमग, सख्याच्या प्रेमात डुंबतांना कशी जीवघेणी होते,हे 
छान विरह गीतच आहे.
मला डॉक्टर म्हणून हा 'स्तनपान संदेश "हि आवडला कारण आम्ही मंडळी त्यासाठी, स्तनपान सप्ताह"साजरा करतो.
आईचे दूध अमृतासमान 
बाळासाठी ठरते वरदान 
निरोगी,प्रेमळ जीवनास,
मातांनो करा हो स्तनपान!
व स्तनपानाचे फायदे दोघांनाही आहेत, बाळाबरोबर मातेलाही!
मिलनाची आस मध्ये कवयित्री सांगते,
प्रेमाच्या मिठीत पहुडता,
गाणे गाऊ या पावसाचे!
मिलनाची लागता आस,
धडे मिळाले हो जीवनाचे!
मिलन,मिठी व त्याची आस हा खरंतरं प्रेमी युगुलाचा सुंदर सोहळाच असतो.
अण्णाभाऊ साठे विषयी काढलेले उद्गगार ही मला भावले.
आपणच आपल्या देशात,
दुर्लक्षित केला साहित्य रत्न 
हात का असे मागे सरतात?
गौरव करण्यास 'भारत रत्न'
आई माझी कल्पतरू,या कवितेत आईची महती गायलेली आहे.
आई माझी कल्पतरू 
आहे मायेचा सागर 
जीवनात आनंदाने,
भरे प्रेमाची घागर!
खरंच आईसारखं दैवत जगात नाही.
बाबासाहेब आंबेडकर वरची कविता ही अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे.
बाबासाहेबांची लेखणी धारदार,
अन्यायावर करी गहरी प्रहार!
ज्ञानसूर्याचा सखोल विचारांचा,
लिखाणातून प्रकटे साक्षात्कार!
राजर्षी शाहू महाराज यात ती 
सांगते..
शाहू महाराजांनी राज्यात,
जपला जनतेचा स्वाभिमान,
शिक्षणाचा प्रसार करुन हो,
मिळविला रयतेचा मान.
शाहू महाराजांनी कितीतरी लोकोत्तर, काळाच्या पुढची कामे केली.आपल्या संस्थानात त्याकाळी अस्पृश्यांना आरक्षण दिलं.शिक्षणाच्या संधी दिल्या.
समानता, बंधुभाव याची शिकवण दिली.
शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड या राजांनी काळाच्या पुढचे निर्णय त्याकाळी घेतले व ते अंमलात आणले.
पुनर्विवाह 
ही कविता ही लक्षवेधी आहे.
अपमानाचे जीवन सोडण्या,
सुखाचे जीवन जगण्यास
पुनर्विवाह करावा लागतो.
हक्काचे नाते जपण्यास.
पुरुष मात्र बायको वारली कि दुसरे लग्न करण्यास तयार!
मात्र स्त्री ला दुसरे लग्न करण्यास मान्यता नाही! व रांडव बाईचे जीणेही कठीण होते.
हि कुठली रीत?
हा काव्यसंग्रह म्हणजे उत्तम प्रतिमांचा,प्रतिमेने दिलेला नजराणाच आहे.व कवयित्री कुठेही नवखी किंवा पहिलाच संग्रह असल्याचे जाणवत नाही.
सौ सुनिता कपाळे यांचे बर्ल्ब ही छानच आहे.
प्रतिमेच्या 'प्रतिमा'चा सुगंध सर्वदूर पसरो हिच ईशचरणी प्रार्थना करतो!

डॉ.राजेश वि. गायकवाड.
प्रोफेसर मेडिकल कॉलेज 
तथा लेखक व कवी 
सदस्य 
साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन मुंबई 
२३.०१.२०२५, गुरूवार 
पंचवटी नाशिक 
९८४८९४१६३५ मोबाईल नंबर

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...