Skip to main content

भिडेवाड्यात हो वाड्यात । मुलींची पहिली शाळा । कसा फुलविला । शिक्षणाचा मळा॥

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल मध्ये, कवी मनोहर पवारांचा काव्य जागर .

केळवद जि बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ग्रामिण  कवी, साहित्यिक, मनोहर पवार यांनीआंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पुणे येथे काव्य संमेलनात बुलढाणा जिल्हयातून सहभाग नोंदविला . यात सावित्रीमाई फुले जन्मऊत्सवा निमित्ताने जागतिक पातळीचे ६०० कवींनी सहभाग नोंदविलात्यामध्ये, दुबई, केरळ, आध्र, तामिळ, दिल्ली, आणि विविध राज्यातून मराठी आणि सत्यशोधक फुले प्रेमींनी सहभाग नोंदविला .

या अभूतपूर्व महासंमेलनाचे आयोजक भिडेवाडा कार, विजय वडवेराव यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले . त्यात सावित्रीमाई फुले फातीमा बी,तसेच लहूजी साळवे, महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर संघर्षावर आधारीत नाट्य, एकपात्री, अभिनय, काव्य वाचन, तसेच, गझल, पोवाडे, कट्टा दांडपट्टा, जुदो कराटे, आदी कलांचे प्रात्याक्षिक करण्यात आले . सहभोजन, आणि  स्नेहमिलन कार्यकम झाला . ८० वर्षांच्या वयस्कर आजीपासून ते १५ वर्षांच्या मुली पर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला . सर्वांना भारताचे संविधान व स्मृती चिन्ह तसेच आकर्षक समान चिन्ह प्रदान करण्यात आले .एस. ए म. जोशी सभागृहात ( पूणे ) रंगलेले हे फुले फेस्टिवल जागतिक उंचीचे ठरले . कारण सतत पाच दिवस अखंड काव्य ज्योत पेटलेले हे देशातील पहिले संमेलन  नोंद झाली . सावित्रीच्या वेषात सभागृह भरून उरले . क्रांती ज्योत पेटविणारे भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी स्वयंस्फूर्तीने व्यक्तीगत खर्चाने कुठलेही प्रवेश शुल्क न घेता कार्यक्रम आयोजित करीत जागतिक विक्रमच केला . याच कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील कवी मनोहर पवार यांनी सावित्री माय वर सुंदर,  भिडे वाडयात वाडयात । पहिली मुलींची शाळा ।
कसा फुलविला ।
शिक्षणाचा मळा॥ ही अत्यंत प्रभावी सुंदर
रचना सादर करून क्रांती जागर केला . दाद मिळवली . या आंतराष्टीय काव्य संमेलनात मला रुहभागी होता आले हे मी माझे भाग्य व बहुमान समजतो असे सांगीतले . कवी शाहीर, मनोहर पवार हे सातत्याने काव्य लेखन करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर काव्य वाचन करणारे बहुचर्चित कवी ठरले आहेत . त्यांच्या बरोबर कवी संजय हिवाळे, अशोक मोहीते, डॉ. मंजुराजे जाधव, पंढरीनाथ शेळके, तसेच निवृती जाधव, अनिल नाटेकर येळगांवकर, सौ सुवर्णा पवार, इत्यादींनी निमंत्रीत कवी म्हणून सहभाग नोंदविला .

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...