(अतुल फडके - कल्याण)
रविवारी १२ जानेवारी रोजी सहकार भारतीचा स्थापना दिन कल्याणच्या अभिनव शाळेत साजरा करण्यात आला ़सहकार भारती ही राष्ट्रीय संस्था असून भारतीय सहकार क्षेत्रात (१९७८)स्थापनेपासून कार्यरत आहे ़संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांनी या संस्थेची स्थापना केली ़११ जानेवारी १९७९ रोजी ही संस्था नोंदणीकृत झाली ़सहकारी सहकारी क्षेत्रांना प्रोत्साहन देणे, त्यांची कार्यक्षमता वाढवणे, सहकारी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे ,ग्रामीण व शहरी भागातही या चळवळीचा विस्तार करणे ,व सहकारी संस्थांचे संघटन करणे, हे सहकार भारतीचे मुख्य उद्देश आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून या सहकार भारती संस्थेची स्थापना झाली असून "मूल्यांशिवाय सहकार्य नाही सहकार्याशिवाय मोक्ष नाही" असे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे़़ अशी संस्थेबद्दल माहिती एडवोकेट उज्वला पाटील यांनी दिली टेन्शनतरी सहकार भारतीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने १०मान्यवरांना "सहकार भूषण "पुरस्काराने गौरविण्यातत आले ़कल्याण जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले ़श्री सतीश मेढी, श्री मधुसूदन पाटील ,श्री योगेश वाळुंजकर ,आदी मान्यवर व कार्यकर्ते हितचिंतक कार्यक्रमास उपस्थित होते ़
Comments
Post a Comment