Skip to main content

'अशी भरली ग्रामसभा' नाटिकेची जिल्हास्तरावर निवड

श्रीरामपूर (प्रतिनिधी )--  जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित श्रीरामपूर पंचायत समिती तालुकास्तर सांस्कृतिक स्पर्धा अशोकनगर येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या.बालगटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडीच्या विद्यार्थ्यांची 'अशी भरली ग्रामसभा' ही विनोदी आणि प्रबोधनपर ठरणारी नाटिका तालुक्यात पहिली आली.या नाटिकेचे संवादलेखन आणि दिग्दर्शन उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले आहे. ही नाटिका जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख  आंबीलवादे, केंद्रसमन्वयक राजेंद्र केदारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक आणि शालेय व्यवस्थापन समिती माळेवाडी, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे आदींनी अभिनंदन केले. ग्रामसुधारक उपक्रमांना आवश्यक आदर्श ग्रामसभेचे सादरीकरण बालकलाकार सोहम वमने,आर्यन बनसोडे, साई उमाप,यश वमने, अमन शहा ,सत्यजित उमाप, श्रीजीत लबडे, कृष्णा खिलारी, ओमकार ताके,गणेश पवार, आदित्य ठाकरे, विराज ,विराट करपे,आरुषी वमने, ईश्वरी घोडके, ज्ञानेश्वरी ताके,अरबीया शेख, जानवी ठाकरे, पूजा वमने, काव्या औताडे यांनी भूमिका केल्या आहेत.स्पर्धेच्या यशासाठी मुख्याध्यापक अशोक बनसोडे, राजू भालेराव, सारिका लोखंडे, मीरा ससाणे, मीनाक्षी जाधव आणि जयश्री मॅडम यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...