Skip to main content

तर, नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही : अपर पोलीस आयुक्त संजय जाधव


कल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला आहे. प्रशासन आणि पत्रकारांनी हातात हात घालून काम केल्यास नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी येथे केले.

कल्याण पश्चिमेकडील स्वामी नारायण सभागृह येथे प्रेस क्लब, कल्याण च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार हा बातमीमध्ये विविध विश्लेषण वापरण्या बरोबरच त्याबाबतचे संदर्भ आणि अन्य माहिती गोळा करून मांडत असतो. अशा प्रकारची पत्रकारिता करणे सोपे काम नाही. त्याचबरोबर, सध्या सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या स्पर्धेत प्रिंट मिडियाने आपले वेगळेपण जपले आहे. स्पर्धेच्या या युगात पत्रकारांनी आपले काम करताना आपल्या तब्येतीची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पत्रकारांनी सुशासन तयार करणे आवश्यक आहे ते करत असताना आपल्यावरचा ताण कमी कसा होईल आणि आपले आरोग्य सुरक्षित कसे राहील याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचा सल्ला यावेळी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना दिला.

पत्रकारांच्या बातमी मागे असलेल्या कष्टाचा कोणी विचार करत नाही. पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्यादेखील वाचक म्हणून आपण जाणल्या पाहिजेत, पत्रकारांच्या समस्यांबाबत कोणी आवाज उठवत नाही. ते देखील आपल्यासाखीच माणसेच आहेत, आपणही त्यांच्याकडे त्या भावनेने बघणे आवश्यक असल्याचे मत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी व्यक्त केले.

मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रम प्रेस क्लब राबवत आहे त्यामागची त्यांची भावना महत्वाची असल्याचे मत लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सध्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक नवीन नवीन आव्हानांना पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये सध्या वाढ होत आहे. या माध्यमातून चांगल्या बातम्या मिळायला लागल्या तर पत्रकारांची गरज भासणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली गरज निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपली लिखाणशैली विकसित करण्यावर भर देणे ही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या बातम्यांमधून आपण वेगळे काय देणार हे महत्वाचे असण्याबरोबरच आपली एक तरी बातमी इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी प्रयत्न करायला हवा.

यावेळी, केडीएमसीच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके यांच्यासह प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विविध वृत्तपत्र , वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना विष्णुकुमार चौधरी, यांनी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर   प्रदीप जगताप यांनी आभार मानले

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...