Skip to main content

तर, नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही : अपर पोलीस आयुक्त संजय जाधव


कल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला आहे. प्रशासन आणि पत्रकारांनी हातात हात घालून काम केल्यास नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी येथे केले.

कल्याण पश्चिमेकडील स्वामी नारायण सभागृह येथे प्रेस क्लब, कल्याण च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार हा बातमीमध्ये विविध विश्लेषण वापरण्या बरोबरच त्याबाबतचे संदर्भ आणि अन्य माहिती गोळा करून मांडत असतो. अशा प्रकारची पत्रकारिता करणे सोपे काम नाही. त्याचबरोबर, सध्या सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या स्पर्धेत प्रिंट मिडियाने आपले वेगळेपण जपले आहे. स्पर्धेच्या या युगात पत्रकारांनी आपले काम करताना आपल्या तब्येतीची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पत्रकारांनी सुशासन तयार करणे आवश्यक आहे ते करत असताना आपल्यावरचा ताण कमी कसा होईल आणि आपले आरोग्य सुरक्षित कसे राहील याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचा सल्ला यावेळी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना दिला.

पत्रकारांच्या बातमी मागे असलेल्या कष्टाचा कोणी विचार करत नाही. पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्यादेखील वाचक म्हणून आपण जाणल्या पाहिजेत, पत्रकारांच्या समस्यांबाबत कोणी आवाज उठवत नाही. ते देखील आपल्यासाखीच माणसेच आहेत, आपणही त्यांच्याकडे त्या भावनेने बघणे आवश्यक असल्याचे मत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी व्यक्त केले.

मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रम प्रेस क्लब राबवत आहे त्यामागची त्यांची भावना महत्वाची असल्याचे मत लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सध्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक नवीन नवीन आव्हानांना पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये सध्या वाढ होत आहे. या माध्यमातून चांगल्या बातम्या मिळायला लागल्या तर पत्रकारांची गरज भासणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली गरज निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपली लिखाणशैली विकसित करण्यावर भर देणे ही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या बातम्यांमधून आपण वेगळे काय देणार हे महत्वाचे असण्याबरोबरच आपली एक तरी बातमी इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी प्रयत्न करायला हवा.

यावेळी, केडीएमसीच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके यांच्यासह प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विविध वृत्तपत्र , वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना विष्णुकुमार चौधरी, यांनी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर   प्रदीप जगताप यांनी आभार मानले

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...