प्रमोद सूर्यवंशी मुंबई.
पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखा.. अशी खंत मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी व्यक्त केली आहे.पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पंढरपूर येथील नदी किनारी घाटाच्या शेजारी असलेल्या होळकर वाडा सध्या पंढरपूर नगरपालिका कडून विकासासाठी मध्यंतरी पाडण्यात येणार होता,पण पंढरपूर मधील राजमाता अहिल्याबाई होळकर प्रेमींनी व धनगर समाज बांधवांनी विरोध करुन डाव हाणून पाडला, याबद्दल त्या सगळ्यांचे मनापासून आभार, या वाड्यात राम मंदिर आहे, येणारे जाणारे भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात, परंतु घाटावर वास्तव्य करणारी येथील पुरुष व महिला येथे कपडे वाळत घालतात, मंदिराच्या पायऱ्यांवर अस्ताव्यस्त बसलेले, झोपलेले आढळून येतात, यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होते, दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंचाईत होते, काही भाविक लांबूनच दर्शन घेऊन जातात, पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखण्यासाठी धनगर समाज बांधवांनी प्रयत्न करावे, असे मुंबई कांदिवली पश्चिम येथील व मूळ गाव पंढरपूर असलेले पत्रकार भारत कवितके यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment