जेव्हा जीवन सुंदर बहरलेले असते
तेव्हाच अचानक वावटळ यावी
आणि सारे होत्याचे नव्हते होणे
काय घडते हे समजण्याच्या पलीकडील
ज्यांच्या सोबत इतके वर्षे आपण विश्वासाने राहतो
अन् तीच व्यक्ती अचानक आपल्या जवळून,आपल्या डोळ्यासमोर
कोणीतरी कायमची दूर घेवून जातो
आपल्याला पूर्ण एकटे कडून
काय मिळते या नियतीला
घराचे सारे घरपणच निघून जाते
जो दरारा असतो भोवताली
तो ही त्या सोबत नाहीसा होतो..
एखाद्या आश्रितासारखं जीवन होवून जात..
दोन फुले आताच कोठे कळी तून बाहेर आलेली असतात
त्यांना भक्कम आधारावर बहरायचे असते
पण,तो त्यांचा आधारच काढून घेतला जातो
दोन्ही चाकापैकी एक चाक जेव्हा निखळते
तेव्हा जीवन रथ एक चाक किती दिवस हाकणार ना?
कसोटी कायमच पाचीला पुजलेली असते का?
हीच का सटवी
जी सर्व काही लिहून जाते पाचवीला..
ते ही काहीच व्यक्तींच्या बाबतीत...
काही खूप भाग्यशाली असतात..
त्या फुलांचा काय दोष असतो..
त्यांना यांनीच जन्माला घातलेलं असते
आणि मध्येच एखादा त्यांना पोरका करून जातो
तेव्हा त्यांनी कोणाकडे पहायचे?
ते चाक जर स्व बळावर चालत असेल तर ठीक
नाहीतर रोजच्या जगण्याचा प्रश्न? भाकरीचा प्रश्न?
नव्हे प्रश्न मालिका सुरू होते
तेव्हा कोणी कोणाच्या कामा येत नाही
दुरून सल्ले देणारे हजारो असतात
पण,प्रत्यक्षात मदत करणारे कोणीच नाही?
फुकटचा सल्ला कोणीही देते ओ?
स्वतः च्या दाराच्या फटीतून सारी गंमत पहात बसायची
काय म्हणायचे याला तुम्हीच सांगा?
कोणता प्रसंग कोणावर कधी,कसा येईल
कोणीच,काहीच सांगू शकत नाही..
हे च जीवन आहे....
तुझ्या नंतरची ही पंधरा वर्षे
रोज एक एक दिवस मोजला
प्रत्येक दिवसाचा हिशोब देवू का?
तू ही थकून जाशील?
तू ही म्हणशील,मला नसते इतके शक्य?
आपले फिरणे ही राहून गेले..
चार भिंती बाहेरचे जग पहायचे होते?
मनसोक्त बागडायचे होते?
निसर्गाशी हितगुज करायची होती?
मंद हवेची झुळूक अनुभवायची होती
पौर्णिमेच्या रात्री मस्त फिरायचे होते
माझी स्वप्न ही स्वप्नच राहिली?
परदेश वारी चे इतके अप्रुप कधीच नव्हते
आपलाच भारत म्हण किंवा महाराष्ट्र तरी या डोळ्यांनी मन भरून पहायचा होता
ते ही आपल्या हक्काच्या व्यक्तीसोबत
ते खरे जगणे असते
मिर्ची भाकर माझी सर्वात आवडती
हॉटेलची ही कधी मला आवड नव्हती
असो,आपली लेकर आता मोठी झालीत
माझ्या शब्दांनी सर्वजग फिरून येते..
तू काळजी करू नकोस?
जगते अन् जगणारच
अन् असे रडत कढत जगणे मला जमत नाही
भरपूर चिडते,रडते,ओरडते,व्यक्त होते
पण,पुन्हा मी माझी होते...
शांत होते...
पण,आतून विषमतेची आग चैन पडून देत नाही...
कोणताही अपराध नसतांना दिलेली वागणूक
मला सहन होत नाही
मी आवाज उठवते
दबवण्याचा खूप हात प्रयत्न करतात
नको ते वार करतात?
पण,हार कधी मारत नाही
नको तेथे झुकत नाही
बैल दूध देत नाही तर देतच नाही
नुसती बैला सारखी मान हलवणे मला जमले नाही
आणि कदापी जमणारही नाही...
आपली लेकरं ही भरारी घेतील..
त्यांनीही माणुसकी जपली..
माणुसकीचे पुजारी जो होतो तोच
खरा माणूस म्हणून घेण्यास लायक ठरतो
तशी दोन्ही ही लेकरं आहेत...
फक्त त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे इतकीच अपेक्षा...
तू ही सर्व पहात असणार...
तुझेही आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच..
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
Comments
Post a Comment