Skip to main content

शीर्षक - तू....


जेव्हा जीवन सुंदर बहरलेले असते
तेव्हाच अचानक वावटळ यावी
आणि सारे होत्याचे नव्हते होणे
काय घडते हे समजण्याच्या पलीकडील
ज्यांच्या सोबत इतके वर्षे आपण विश्वासाने राहतो
अन् तीच व्यक्ती अचानक आपल्या जवळून,आपल्या डोळ्यासमोर
कोणीतरी कायमची दूर घेवून जातो 
आपल्याला पूर्ण एकटे कडून
काय मिळते या नियतीला 
घराचे सारे घरपणच निघून जाते
जो दरारा असतो भोवताली
तो ही त्या सोबत नाहीसा होतो..
एखाद्या आश्रितासारखं जीवन होवून जात.. 
दोन फुले आताच कोठे कळी तून बाहेर आलेली असतात
त्यांना भक्कम आधारावर बहरायचे असते
पण,तो त्यांचा आधारच काढून घेतला जातो
दोन्ही चाकापैकी एक चाक जेव्हा निखळते
तेव्हा जीवन रथ एक चाक किती दिवस हाकणार ना?
कसोटी कायमच पाचीला पुजलेली असते का?
हीच का सटवी
जी सर्व काही लिहून जाते पाचवीला..
ते ही काहीच व्यक्तींच्या बाबतीत...
काही खूप भाग्यशाली असतात..
त्या फुलांचा काय दोष असतो..
त्यांना यांनीच जन्माला घातलेलं असते
आणि मध्येच एखादा त्यांना पोरका करून जातो
तेव्हा त्यांनी कोणाकडे पहायचे?
ते चाक जर स्व बळावर चालत असेल तर ठीक
नाहीतर रोजच्या जगण्याचा प्रश्न? भाकरीचा प्रश्न?
नव्हे प्रश्न मालिका सुरू होते
तेव्हा कोणी कोणाच्या कामा येत नाही
दुरून सल्ले देणारे हजारो असतात
पण,प्रत्यक्षात मदत करणारे कोणीच नाही?
फुकटचा सल्ला कोणीही देते ओ?
स्वतः च्या दाराच्या फटीतून सारी गंमत पहात बसायची
काय म्हणायचे याला तुम्हीच सांगा?
कोणता प्रसंग कोणावर कधी,कसा येईल 
कोणीच,काहीच सांगू शकत नाही..
हे च जीवन आहे....
तुझ्या नंतरची ही पंधरा वर्षे 
रोज एक एक दिवस मोजला
प्रत्येक दिवसाचा हिशोब देवू का?
तू ही थकून जाशील?
तू ही म्हणशील,मला नसते इतके शक्य?
आपले फिरणे ही राहून गेले..
चार भिंती बाहेरचे जग पहायचे होते?
मनसोक्त बागडायचे होते?
निसर्गाशी हितगुज करायची होती?
मंद हवेची झुळूक अनुभवायची होती
पौर्णिमेच्या रात्री मस्त फिरायचे होते
माझी स्वप्न ही स्वप्नच राहिली?
परदेश वारी चे इतके अप्रुप कधीच नव्हते
आपलाच भारत म्हण किंवा महाराष्ट्र तरी या डोळ्यांनी मन भरून पहायचा होता
ते ही आपल्या हक्काच्या व्यक्तीसोबत
ते खरे जगणे असते 
मिर्ची भाकर माझी सर्वात आवडती
हॉटेलची ही कधी मला आवड नव्हती
असो,आपली लेकर आता मोठी झालीत
माझ्या शब्दांनी सर्वजग फिरून येते..
तू काळजी करू नकोस?
जगते अन् जगणारच
अन् असे रडत कढत जगणे मला जमत नाही
भरपूर चिडते,रडते,ओरडते,व्यक्त होते
पण,पुन्हा मी माझी होते...
शांत होते...
पण,आतून विषमतेची आग चैन पडून देत नाही...
कोणताही अपराध नसतांना दिलेली वागणूक
मला सहन होत नाही
मी आवाज उठवते
दबवण्याचा खूप हात प्रयत्न करतात
नको ते वार करतात?
पण,हार कधी मारत नाही
नको तेथे झुकत नाही
बैल दूध देत नाही तर देतच नाही
नुसती बैला सारखी मान हलवणे मला जमले नाही
आणि कदापी जमणारही नाही...
आपली लेकरं ही भरारी घेतील..
त्यांनीही माणुसकी जपली..
माणुसकीचे पुजारी जो होतो तोच 
खरा माणूस म्हणून घेण्यास लायक ठरतो
तशी दोन्ही ही लेकरं आहेत...
फक्त त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे इतकीच अपेक्षा...
तू ही सर्व पहात असणार...
तुझेही आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच..

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...