Skip to main content

*समीक्षण*. काव्य संग्रह:- कव्यमालाकवी:- धनजंय इंगळेपृष्ठ:- ६४किंमत:- ११० रुपयेप्रकाशन:- वारकरी प्रकाशनमुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारीप्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५



काव्य संग्रह:- कव्यमाला
कवी:- धनजंय इंगळे
पृष्ठ:- ६४
किंमत:- ११० रुपये
प्रकाशन:- वारकरी प्रकाशन
मुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारी
प्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५

          हातात पुस्तक पडताच त्याचा सुगंध मनाला मोहवून गेला.काव्याच्या एका एका पुष्पाने ही काव्यमाला अलगद शब्द रूपाने गुंफली गेली.शब्दमोती किती अनमोल असतात हे आपणास ठावूक आहेच.सोन्यापेक्षा ही याचे मोल अनमोल आहे.काव्यसंग्रहाच्या अंतरंगात एकूण ५२ कविता व मल पृष्ठावर एक अशा एकूण ५३ कविता या काव्यसंग्रहात आहेत.प्रत्येक काव्याचा ढंग हा आगळा वेगळा आहे.
        काव्य संग्रहाला संपादक,गीतकार,साहित्यिक गुलाबराजा फुलमाळी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.सुवर्ण अनुभवांची गुंफण म्हणजेच काव्यमाला..असा सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केला.भवनाचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य असते असे माझे तरी म्हणणे आहे.एखादी भावना मनात उत्पन्न झाली की,ती काव्याच्या रूपाने अलगद प्रसूत होते...एक एक मोती अचूक हेरला आणि त्याला गुंफले जाते,तेव्हा आपलेच अपत्य आपल्याला कुरवळतांना किती आनंद होतो.स्व निर्मिती मनाला नवीन ऊर्जा देवून जाते.साहित्यिकांची ही ठेव असते,जगण्याची दिशा असते,नवी आशा असते,एक नवा उत्साह असतो,त्यात प्रेम,माया,ममता,जिव्हाळा,आपुलकी,माणुसकी ओतपोत भरलेली असते.अमोल हरिभाऊ जावळे सरांचे शुभेच्छा पत्र ही या काव्यसंग्रहास लाभले...हे आशीर्वाद ही लाख मोलाचे ठरले.
          दुनियादारी चित्रपट पाहतांना त्यातील ती घट्ट मैत्री आठवते.मैत्रीची दुनिया नामानिराळी असते.धनजंय सरांचा सर्व मित्र परिवार खूप अनोखा आहे.खूप जीवापाड प्रेम करणारे त्यांचे मित्र आहे....म्हणजे धनजंय सरच तितके प्रेमळ,निर्मळ आहेत..त्यामुळे त्यांच्या सहवासात येणारे प्रत्येक जण तितकेच प्रेमळ असणारच..यात शंकाच नाही.आपला एक मित्र कवी आहे,त्याच्या कविता हे सर्व जण नित्य वाचतात, ऐकतात... त्यामुळे त्यांच्या मनात इतका पवित्र,निर्मळ,सोज्वळ विचार येणे हे साहजिक आहे.आपल्या मित्राची चक्क या काव्यसंग्रहाची सारी पुस्तकेच त्यांनी छापली."मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा"....,ही ओळ आमच्या लाडक्या कवी मित्राची म्हणजे अनंत राऊत यांची आठवली. असा मित्र गोतावळा धनजंय सरांच्या आजूबाजूला आहे...हे ही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.सर्व मित्र परिवाराची नावे यात आलेली आहेत,तरी काही नावे राहिली असेल याची रुख रुखं ही त्यांच्या मनाला लागलेली आहे..या सर्वांना आम्हा साहित्यिक परिवाराकडून मनस्वी धन्यवाद.ही मैत्री एकाने नाही तर सर्व समूहाने जपली हे ही विशेष.तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे.तुमचा पुस्तक प्रकाशन वेळेचा उत्साह ही अप्रतिम होता.माझी तब्बेत बरी असती तर मी ही या सोहळ्याला येणार होतेच,पण येता आले नाही.सरांनी प्रत्येकाचे तोंड भरून कौतुक केले.सारे दृश्य नजरेसमोरून गेले.अशीच मैत्री जपावी..हा मोलाचा उपदेश यातून मिळतो.
       या पुस्तकाचे रुप माझ्यासमोर खुले झाले हे माझ्यासाठी अभिमानास्पद होते.तत्परता यातून जाणवली.राहुल मुंढे सरांनी हे मित्र प्रेम जाणून वेळेत संग्रह छापून दिला या बद्दल सरांचे मनापासून धन्यवाद.यातील प्रत्येक काव्य मनाला  स्फुरण देते.धनजंय सरांचे मनोगत ही अतिशय सुंदर आहे.भावपूर्ण शब्दांचा खजिना रिता केला त्यांनी.या काव्य संग्रहाचा सर्वांनी माझ्या प्रमाणे आस्वाद घ्यावा.धनजंय सरांना पुढील साहित्यिक वाटचालीस मनस्वी मोरपंखी शुभेच्छा देते.

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण,पुणे- 411044
शिक्षिका,लेखिका,कवयित्री,निवेदिका
मो.न.8830654661/ 9405042938

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...