Skip to main content

धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी आंदोलनाची धार बोथट होऊ देऊ नका ".. पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.


भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूकीपूर्वीची धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी ची मागणी तीव्रतेने महाराष्ट्र राज्य भर जाणवत होती.मागणीची धार आता निवडणुकीनंतर बोथट होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.ही धार समाज बांधवांनी बोथट होऊ देऊ नये. असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आवाहन केले आहे.पुढे एका मुलाखतीत भारत कवितके म्हणाले," पूर्वी आपला समाज विखुरलेल्या अवस्थेत, शिक्षणापासून दूर, अशिक्षित होता, त्यामुळे आपल्या अस्तित्वाची त्यांना जाणीव झाली नसेल हे कारण सांगून आपले पूर्वज यातून सुटले असले तरी येणारी आपली पिढी मात्र आपणाला माफ करु शकणार नाही.कारण आता समाज चांगलाच जागृत झाला असून शिक्षणाने,विचाराने खूप पुढे गेला आहे.आपल्या आस्तित्वाची त्यास पूर्ण जाणीव झाली आहे.संविधान समाविष्ट आपली मागणी योग्य असून ही आपल्या समाजाला आतापर्यंतच्या राज्यकर्ते यांनी एसटी आरक्षण अमंलबजावणी पासून दूर ठेवले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यातील सुशिक्षित तरुण बांधवांनी पुणे येथे अधिवेशन घेऊन राज्य भर आमरण उपोषण, रास्ता रोको, ढोल बजाओ आंदोलन, निवेदन देणे, अशी विविध प्रकारची आंदोलने करून समाज जागृती केली.छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास कार्यालयाकडून धनगड प्रमाण पत्र रद्द करण्यात जरी यश आले तरी आपणास पूर्ण लढाई जिंकता आली नाही.यांची खंत वाटते, विधानसभेत आपले समाजाचे विविध पक्षातून पाच आमदार निवडून आले, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे झाले.या सर्व सकारात्मक गोष्टीनी हुरळून न जाता पुढील अर्धवट राहिलेली लढाई सुरू करायला हवी, राजभवन मध्ये राज्यपाल ला भेटून सविस्तर माहिती देऊन त्यांनी फक्त विचार करून कारवाई करु असे सांगितले.त्यासही बराच वेळ गेला.एकनाथजी शिंदे यांनी पंधरा दिवस मुदत देऊन ही दुर्लक्ष केले.दुसर्या बाजूंनी आदिवासी चे आमदार आपल्या एसटी आरक्षण अमंलबजावणीला राज्य भर आंदोलने करून विरोध करत होते.आपले पाच आमदार विधानसभेत आपल्या रास्त मागणी साठी डरकाळी फोडतीलच यावर समाजाचा पूर्ण विश्वास आहे, तरीही सकल धनगर समाजाने ढिले राहता कामा नये,निवडणूकी पूर्वीची धार पुन्हा आंदोलनासाठी आणावी,जो पर्यंत आपली रास्त मागणी पदरात पडत नाही तोपर्यंत आंदोलन व्हावीत, मागणी मान्य झाली तर समाज कशाला आंदोलने करेल?
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
मोबाईल..8652305700

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...