धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी आंदोलनाची धार बोथट होऊ देऊ नका ".. पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूकीपूर्वीची धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी ची मागणी तीव्रतेने महाराष्ट्र राज्य भर जाणवत होती.मागणीची धार आता निवडणुकीनंतर बोथट होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.ही धार समाज बांधवांनी बोथट होऊ देऊ नये. असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आवाहन केले आहे.पुढे एका मुलाखतीत भारत कवितके म्हणाले," पूर्वी आपला समाज विखुरलेल्या अवस्थेत, शिक्षणापासून दूर, अशिक्षित होता, त्यामुळे आपल्या अस्तित्वाची त्यांना जाणीव झाली नसेल हे कारण सांगून आपले पूर्वज यातून सुटले असले तरी येणारी आपली पिढी मात्र आपणाला माफ करु शकणार नाही.कारण आता समाज चांगलाच जागृत झाला असून शिक्षणाने,विचाराने खूप पुढे गेला आहे.आपल्या आस्तित्वाची त्यास पूर्ण जाणीव झाली आहे.संविधान समाविष्ट आपली मागणी योग्य असून ही आपल्या समाजाला आतापर्यंतच्या राज्यकर्ते यांनी एसटी आरक्षण अमंलबजावणी पासून दूर ठेवले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यातील सुशिक्षित तरुण बांधवांनी पुणे येथे अधिवेशन घेऊन राज्य भर आमरण उपोषण, रास्ता रोको, ढोल बजाओ आंदोलन, निवेदन देणे, अशी विविध प्रकारची आंदोलने करून समाज जागृती केली.छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास कार्यालयाकडून धनगड प्रमाण पत्र रद्द करण्यात जरी यश आले तरी आपणास पूर्ण लढाई जिंकता आली नाही.यांची खंत वाटते, विधानसभेत आपले समाजाचे विविध पक्षातून पाच आमदार निवडून आले, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे झाले.या सर्व सकारात्मक गोष्टीनी हुरळून न जाता पुढील अर्धवट राहिलेली लढाई सुरू करायला हवी, राजभवन मध्ये राज्यपाल ला भेटून सविस्तर माहिती देऊन त्यांनी फक्त विचार करून कारवाई करु असे सांगितले.त्यासही बराच वेळ गेला.एकनाथजी शिंदे यांनी पंधरा दिवस मुदत देऊन ही दुर्लक्ष केले.दुसर्या बाजूंनी आदिवासी चे आमदार आपल्या एसटी आरक्षण अमंलबजावणीला राज्य भर आंदोलने करून विरोध करत होते.आपले पाच आमदार विधानसभेत आपल्या रास्त मागणी साठी डरकाळी फोडतीलच यावर समाजाचा पूर्ण विश्वास आहे, तरीही सकल धनगर समाजाने ढिले राहता कामा नये,निवडणूकी पूर्वीची धार पुन्हा आंदोलनासाठी आणावी,जो पर्यंत आपली रास्त मागणी पदरात पडत नाही तोपर्यंत आंदोलन व्हावीत, मागणी मान्य झाली तर समाज कशाला आंदोलने करेल?
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
मोबाईल..8652305700
Comments
Post a Comment