Skip to main content

*कोकण मराठी साहित्य परिषद**ठाणे शहर शाखा आयोजित* *विषय:-मराठी भाषा: आजची परिस्थिती आणि साहित्य संस्था.**एक आगळावेळा परिसंवाद*


ठाणे : दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ठाणे महानगर पालिकेच्या मराठी शाळा क्रमांक १३ खोपट येथील शाळेच्या  हाॅलमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेतर्फे... मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी सदर कार्यक्रम आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी 
प्रमुख पाहुणे प्रा. संतोष राणे शारदा प्रकाशन, मा. ज्योती कपिले जे के मिडिया,  मा.किशोर भोईर अस्मिता वाचनालय, डॉ. मनोज वैद्य , अध्यक्ष आणि, सूत्रधार व निवेदक श्री मोरेश्वर बागडे यांच्या अथक प्रयत्नातून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील त्यासाठी आपले नागरिक म्हणून योगदान तसेच पत्रकार, साहित्यिक आणि साहित्य संस्था मिळून काय करता येईल याबद्दल  परिसंवादाचे सूत्रधार श्री मोरेश्वर बागडे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींनी परखड विचार मांडले.
 त्यावेळी  कार्यक्रमाला हजर असलेले ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर यांनी मराठी भाषेला हे दिवस कोणी आणले? असा प्रश्न प्रेक्षक म्हणून  व्याख्याते व रसिक प्रेक्षक यांना विचारला. ते म्हणाले,एका बाजूला मराठी भाषा अभिजात केली म्हणून सर्व मराठी जनता मनापासून आनंद व्यक्त करीत असतानाच काल-परवाच महाराष्ट्र शासनाच्या मा.शिक्षण मंत्र्यांनी या वर्षापासून मराठी शाळा सीबीएससी बोर्डाला जोडल्या जातील असे विधान केले. यावरून पुन्हा एकदा मराठी विषयाची शालेय स्तरावर वाट लावण्याची योजना सुरू असल्याची शंका  मला मराठी भाषा अभिमानी म्हणून येते.  आज या ठिकाणी पत्रकार बंधू-भगिनींचा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे सन्मान करण्यात आला त्याचे औचित्य साधून शासनाने सीबीएससी बोर्डाला सर्व शाळा जोडल्या जातील अशी घोषणा केली याबद्दल सर्वांनी पत्रकार म्हणून आवाज उठवावा असे श्री साबळे यांनी आवाहन केले.पत्रकार आणि मान्यवर पाहुण्याच्या समोर उद्याच्या मराठीची अवस्था जी होईल याला जबाबदार कोण?असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सीबीएससी बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा, आपली संस्कार, संस्कृती, परंपरा, साधू संतांची शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांचा इतिहास  सदर सीबीएससी बोर्डाच्या शाळेतून शिकवला जाईल का? ही मनातली खंत आणि प्रश्न? राजेश साबळे,ओतूरकर यांनी उपस्थित केला. 
 आपण मराठी मंडळी स्वतःचं मराठी बोलत नाही. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणून आपली मुले माध्यमाच्या शाळेत शिकतात. अनेक नेते आपल्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून सरकारी मराठी शाळा बंद पडण्याची सोयीस्कर योजना आखली आज अनेक ठिकाणी सोसायटीमधून इंग्रजी मधून माहिती पत्रक पाठविले जाते. हे अनेक मंडळींना लिहिता वाचता येत नसल्याने कळत नाही. एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा आम्ही दिला. लोकांनी शासनाचे मोठे कौतुक केले. आता मराठी शाळाच सीबीएससी बोर्डाला जोडल्या जातील. मग त्यावर आपण पत्रकार साहित्यिक आणि साहित्यिक संस्था काही आवाज उठवणार की नाही?  आपलीच मराठी मायबोली आपल्याच दारात कटोरा घेऊन  उभी आहे तिला कोण वाचविणार! 
उलट मराठी भाषेसोबत महाराष्ट्रातील इतर बोली भाषेचाही सन्मान झाला पाहिजे पण इथे आपणच आपल्या मराठी मातृभाषाचा अडचणीत आणण्याचे काम जोमाने सुरू आहे तिथं इतर भाषांचा काय? अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतुरकर यांनी  खंत व्यक्त केली. यावेळ वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक प्रा. नागेश हुलवळे यांनीही त्यावेळी मराठी भाषा संवर्धनासाठी त्यांची संस्था काय कार्य करते याची माहिती दिली. त्यावेळी निवेदक मा. मोरेश्वर बागडे पाहुणे ज्योती कपिले मनोज वैद्य प्राध्यापक संतोष राणे, किशोर भोईर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते. 
अतिशय छान कार्यक्रम झाला.  ॲड. मनोज वैद्य यांनी उभारलेल्या अनेक गृह घरकुल संकुलातील सोसायट्यांना साहित्यिकांची नावे दिली आणि प्रत्येक मजल्यावर त्या त्या साहित्यिकांचे साहित्य लोकांच्या माहिती साठी उपलब्ध करून दिले आहे ही एक लक्षणीय व अभिमानाची गोष्ट यानिमित्ताने मनाला भावली.
या प्रसंगी अनेक कार्यरत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . सर्व सन्मानित पत्रकारांचे अभिनंदन!!
सुत्रधार व निवेदन मोरेश्वर बागडे यांनी टोकदार  प्रश्न विचारत परिसंवादाचा दर्जा उंचावर नेला. संपूर्ण कार्यक्रम दर्जेदार झाला. उपस्थित श्रोते यांनी ही सहभाग घेत शंका समाधान करून घेतले.परिसंवादाची संवादाची सांगता कविवर्य सुरेश भट यांच्या,"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " या गीताने झाली. सारा श्रोतुवृंद त्यामुळे भारावून गेला. असे कार्यक्रम वारंवार घेतल्यास मराठी भाषेची वृद्धी व अभिमान टिकून राहील आणि लोक जागृती नक्की होईल अशी आशा करूया.
----------------------------
फोटो सौजन्य: चित्रकार व पत्रकार सुभाष जैन 
...................................
*राजेश साबळे ओतूरकर*
ज्येष्ठ साहित्यिक नीलपुष्प ठाणे 
मो. ९००४६७४२६३

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...