(नवी मुंबई): आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, योग विद्या निकेतन वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत महिला दिन विशेष कार्यक्रम 'माझा प्रवास उलगडताना' संपन्न झाला. नवी मुंबईतील कर्तबगार महिलांशीशी संवाद त्यांचा जीवन प्रवास असा या कार्यक्रमाचा विषय होता. प्रातिनिधिक स्वरूपात काही खास महिलांचा तेथे सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी,लेखक,पत्रकार मा.दुर्गेश सोनार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा.नंदकिशोर जोशी, कार्यवाहक डॉ.अरुंधती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षमा वाखारकर यांनी केली तर सूत्रसंचालन सौ.ऋतुजा गवस यांनी केले. या कार्यक्रमाला राधा गानू, शुभांगी पाटील, मीरा जोशी, स्मिता वाजेकर, श्रध्दा साळस्कर, अक्षता गोसावी ऋतुजा गवस, कल्पना देशमुख, भारती वार्डेकर यांचा साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवी मुंबईतील रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नेहमीच अभिनव संकल्पना आणि उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक आणि साहित्यिक, सामाजिक कार्यक्रमही राबविले जातात. तसेच नवसाहित्यिकांना येथे व्यासपीठ व संधी दिली जाते. मा.दुर्गेजशी सोनार यांनी अतिशय सुंदर असा रसिकांशी संवाद साधला. विठूमाऊली संत साहित्य, हायकू काव्य प्रकार उदाहरणासह सांगितला. भावनिक, आध्यात्मिक जोड देऊन संवाद केला. तसेच 'शब्द संवाद' महिला विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा. बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा. हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...
Comments
Post a Comment