Skip to main content

पुस्तक समीक्षणपुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे(ऐतिहासिक कादंबरी)लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं)अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद)प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोरमूल्य::-२०० रुपये एकूण पृष्ठ:- १०४समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४


पुस्तक समीक्षण
पुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे
(ऐतिहासिक कादंबरी)
लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं)
अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद)
प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोर
मूल्य::-२०० रुपये 
एकूण पृष्ठ:- १०४
समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४

पुस्तक म्हणजे आत्मा असतो.त्यात ऐतिहासिक कादंबरी जीव की प्राण.त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित रंजना फतेपुरकर मॅडम यांनी लिहिलेली ही कादंबरी मूळ हिंदी भाषेतील आहे,मैं अहिल्या हूं.त्याचे अनुवादक डॉ.एन.जी.काळे सर आहेत.
        या पुस्तकाला श्रीमंत यशवंतराव होळकर सर,डॉ.सुधीर तांबे सर,घनश्याम होळकर सरांच्या ही शुभेच्छा लाभलेल्या आहेत.तसेच या पुस्तकाची डॉ.देवेंद्र जोशी सरांनी समीक्षा केलेली आहे.रंजना मॅडम यांचे सुंदर असे मनोगत अन् आभार.तसेच रंजना मॅडम यांनी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी अर्पण केलेले आहे.
          पुस्तकाची भाषा ओघवती आहे.सर्व सामान्य व्यक्तींना ही भाषा समजेल त्यामुळे समजून घेण्यास सोपे जाईल.सुरुवातीला व शेवटी काही रंगीत पाने पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन पटावर आधारित आहे.पुस्तक हाती पडताच एका बैठकीत पुस्तक वाचले जाते.कारण,पुढे काय? पुढे काय? याची आपल्याला उत्सुकता लागलेली असते.ज्यांना संपूर्ण माहिती आहे त्यांना ही व ज्यांना फारसी माहिती नाही त्यांना ही .
     डॉ.एन.जी.काळे सरांनी मराठी भाषा अतिशय मार्मिक वापरलेली आहे.त्यांचे मनापासून धन्यवाद.ते भाव मनापर्यंत तंतोतंत पोहचवले जाण्यात दोघे ही यशस्वी झालेले आहेत.या पुस्तकावर आधारित मी एक दीर्घ रचना,एक १५ कडव्यांची रचना तयार केली हा माझ्यासाठी आशीर्वाद ठरला.
           मातेच्या बालपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा संपूर्ण इतिहास या कादंबरी मध्ये साकारला आहे.जणू अहील्याच या साऱ्या गोष्टी आपणास सांगत आहे,म्हणजे त्यांचे आत्मकथन त्या करत आहे.गावाकडचा गोडवा...मैत्रिणी मध्ये रमणे,भावंडांची छोटी छोटी भांडणे,चिडवणे,निसर्गाची आवड,आपल्या निर्मिलेल्या वस्तूची काळजी आपणच घेतली पाहिजे,तिचे संरक्षण करणे आपलीच जबाबदारी आहे.शिवभक्ती,आत्मविश्र्वास,अभ्यासू वृत्ती,शिकण्याची आवड,समंजसपणा,मोठ्या राज घराण्यात गेल्यावर तेथील कुळाचार शिकणे,सर्वांना मान देणे,त्यांची काळजी घेणे.आपली जबाबदारी ओळखणे,ती अचूक पार पडणे,समान न्यायदान करणे,सर्वधर्म समभाव ची शिकवण देते.निसर्गावर,पशू पक्ष्यांवर प्रेम करणे,त्यांची काळजी घेणे,आई समान संपूर्ण प्रजेची काळजी घेणे.कोणीच येथे लहान मोठा नाही.सारे समान आहे,एकमेकांना समजून घेणे,चुकीच्या मार्गावरून चांगल्या मार्गावर आणणे,त्या साठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे,प्रसंगी कडक नियम लादणे.हुंडा घेणाऱ्यांवर प्रतिबंध घालणे,विधवा महिलेस दत्तक पुत्र घेण्याची मंजुरी देणे,त्यासाठी कोणताही सरकारी कर न देणे ,तो संपूर्ण अधिकार त्या महिलेचा आहे,सती चाल बंद व्हावी यासाठी केलेले प्रयत्न,महिलांना त्या काळात प्रशिक्षण देवून त्यांची एक फौज उभी करणे इत्यादी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य.तसेच नाना मंदिरांचा जीर्णोद्धार, घाट,रस्ते,तलाव, बारव,विहिरी,गो शाळा,विश्रामगृह,नदी काठी महिलांना सुरक्षित जागा निर्माण करणे,त्यांच्या मुलांची काळजी घेणे अशी विविध कामे.उत्तेरेपासून ते दक्षिण पर्यंतचा संपूर्ण परिसराचा कायापालट करणे.आपली इन्दौर येथील राजधानी महेश्वर येथे स्थापन करणे.महेश्वरचा विकास करणे.नाना उद्योगांना चालना,मजुरांना कामे,कारागीर,कलाकार यांना स्थान,महेश्वर ची साडी प्रसिद्ध,वस्त्रोद्योग मधील भरभराट.त्या काळात पित्यासमान सासऱ्यांनी घेतलेला अचूक निर्णय.सुनेला सून न समजता लेक समजून..तिला मुला प्रमाणे शस्त्र,शालेय शिक्षण देणे,जबाबदारी देणे.प्रजेची तू आई आहेस..तुला खूप काही करायचे आहे.होळकर शाही हाताच्या/ मनगटाच्या ताकदीने निर्माण केलेली आहे..तिची काळजी घेणे,कोणताही भेदभाव त्यांना मान्य नव्हता..त्या काळात आपल्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह करून दिला.शब्दाला जागणारी माता होती.संस्कारांनी परिपूर्ण..निर्मळ,प्रेमळ माता..त्यांना नाना उपाध्या दिल्या गेल्या.जवळ जवळ ३३ पदव्या/ नावे त्यांना त्यांच्या कार्या ने मिळाली.पुण्यश्लोक ही जनतेने दिलेली सर्वात मोठी उपाधी..जी भगवान श्रीकृष्णा नंतर फक्त अहिल्या मातेला मिळाली. 
       अशा नानाविविध प्रसंगांनी भरलेले मातेचे हे आत्मचरित्र आहे.अभ्यासपूर्ण , साध्या सोप्या भाषेतील आहे.प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असणे गरजेचे आहे.अशा थोर व्यक्तींचे विचार आपल्या मनावर पडणे गरजेचे आहे...नव्हे ही काळाची गरज आहे.
      रंजना मॅडम ,डॉ.एन.जी. काळे सर यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देते.आपल्या साहित्यिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा देते.या प्रमाणे आम्हाला आपले साहित्य वाचण्यास भेटावे अशी अपेक्षा व्यक्त करते.
धन्यवाद!!
                      समीक्षक
            सौ.प्रतिमा अरुण काळे 
   शिक्षिका,लेखिका,कवयित्री,संपादिका,निवेदिका
निगडी प्राधिकरण,पुणे ४४
मो.न.८८३०६५४६६१(कॉलिंग)/९४०५०४२९३८( व्हॉटसअप)

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...