रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा... संभाजी राजे छत्रपती यांची मागणी तर महाराष्ट्रातील धनगर समाज यास तीव्र विरोध करेल.. बाळासाहेब दौडतले.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या मागणीसाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या या मागणीला महाराष्ट्रातील धनगर समाज तीव्र विरोध करेल असे बीड मधील धनगर समाजाचे बाळासाहेब दौडतले यांनी जाहीर केले, यावरून महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरण अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ में २०२५ पूर्वी हटविण्यात यावी, वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठे ही संदर्भ, उल्लेख आढळत नसल्याने आणि भारतीय पुरातत्व विभागाने देखील वाघ्या बाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक काळ संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते,१०० वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी केलेली असून त्यावर मात्र बीड मधील धनगर समाज बांधव तीव्र आक्रमक झालेला असल्याने महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत, धनगर समाजाला वाघ्याची समाधी हटवणे, हे मान्य नाही, बाळासाहेब दौडतले यांनी तीव्र शब्दांत यास विरोध दर्शविला आहे.३१ में २०२५ रोजी महाराष्ट्र भर धनगर समाज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रीशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करणार आहे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या जयंती निमित्त महाराष्ट्रातील चौंडी या ठिकाणी येत आहेत, एसटी आरक्षण अमंलबजावणी असो, मेंढपाळ समस्या असो,चराऊ कुरणे समस्या असो, किंवा इतर सामाजिक समस्या असो धनगर समाजाला संघर्षाशिवाय पर्याय नाही, धनगर समाजाच्या पाचवीला पूजलेल्या संघर्षामध्ये आणखी एका संघर्षाची भर पडली आहे,कुशल, कार्यतत्पर, उत्तम प्रशासक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वादाचे योग्य निवारण करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment