Skip to main content

रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा... संभाजी राजे छत्रपती यांची मागणी तर महाराष्ट्रातील धनगर समाज यास तीव्र विरोध करेल.. बाळासाहेब दौडतले.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या मागणीसाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या या मागणीला महाराष्ट्रातील धनगर समाज तीव्र विरोध करेल असे बीड मधील धनगर समाजाचे बाळासाहेब दौडतले यांनी जाहीर केले, यावरून महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरण अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ में २०२५ पूर्वी हटविण्यात यावी, वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठे ही संदर्भ, उल्लेख आढळत नसल्याने आणि भारतीय पुरातत्व विभागाने देखील वाघ्या बाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक काळ संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते,१०० वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी केलेली असून त्यावर मात्र बीड मधील धनगर समाज बांधव तीव्र आक्रमक झालेला असल्याने महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत, धनगर समाजाला वाघ्याची समाधी हटवणे, हे मान्य नाही, बाळासाहेब दौडतले यांनी तीव्र शब्दांत यास विरोध दर्शविला आहे.३१ में २०२५ रोजी महाराष्ट्र भर धनगर समाज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रीशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करणार आहे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या जयंती निमित्त महाराष्ट्रातील चौंडी या ठिकाणी येत आहेत, एसटी आरक्षण अमंलबजावणी असो, मेंढपाळ समस्या असो,चराऊ कुरणे समस्या असो, किंवा इतर सामाजिक समस्या असो धनगर समाजाला संघर्षाशिवाय पर्याय नाही, धनगर समाजाच्या पाचवीला पूजलेल्या संघर्षामध्ये आणखी एका संघर्षाची भर पडली आहे,कुशल, कार्यतत्पर, उत्तम प्रशासक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वादाचे योग्य निवारण करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...