Skip to main content

के.एल.पोंदा, डहाणू येथे होळी व धुलिवंदन निमित्ताने विविध उपक्रम!


      होळी व धुलिवंदन हा आनंदाचा, उत्साहाचा सण आपल्या महाराष्ट्रात साजरे केले जातात.या सणाचं महत्त्व लक्षात घेऊन शाळेत पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबविले गेले.
   शाळेचे प्राचार्य श्री.सोपान इंगळे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभेच्छांसह उपक्रम संपन्न झाले.होळीच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय हरित सेना व के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.यावेळी वेग वेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली.
यातून झाडे लावा,झाडे जगवा संदेश देण्यात आला.   
             होळी व धुलिवंदन सणानिमित्त देखील विविध उपक्रम... निबंध लेखन,यात पर्यावरण संवर्धन काळाची गरज!, तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, भेट कार्ड (ग्रिटींग कार्ड) तयार करणे, काव्यलेखन,काव्य वाचन, सादरीकरण, कथाकथन,असे विविध उपक्रम,शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका,सौ.अनुपमा जाधव यांनी या उपक्रमांचे आयोजन केले. यात इयत्ता ५वी ते९वीच्या  इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  
         उपमुख्याध्यापिका सौ.रसिका घागस मॅडम, यांनी होळी व धुलिवंदन सणानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सणाबद्दल  माहिती दिली.व अशा उपक्रमाबद्दल पर्यावरणाचा संदेश व जनजागृती केली जाते म्हणून असे उपक्रम राबविले जातात हे कौशल्य निर्माण करणारे उपक्रम आहेत.असे गौरवोद्गार काढले.
      तसेच पर्यवेक्षक श्री.सुनिल मोरे सर यांनी होळी व धुलिवंदन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर भेट कार्ड (ग्रिटींग कार्ड) तयार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.तसेच  या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्यांचा गुणात्मक विकास होण्यासाठी फायदा होईल. सौ.जाधव मॅडम यांनी पर्यावरण पुरक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविले, विद्यार्थी पर्यावरणाची काळजी घेतील.असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

शाळेच्या शिक्षिका मीना वाजे मॅडम यांनी होळी भक्त प्रल्हादची गोष्ट सांगून होळी सणाबद्दल छान माहिती सांगितली.
       तसेच यावेळी  सौ.अनुपमा जाधव (शिक्षिका) तसेच सुशांत चव्हाण, सानिया,पलक, विद्यार्थ्यांनी काही हास्य कविता सादर केल्या.विविध हास्य कविता ऐकून विद्यार्थी आनंदीत झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन, सुत्रसंचलन सौ.अनुपमा जाधव यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...