खाजगी रुग्णालयावर व औषधांच्या कंपन्या वर शासनाचे नियंत्रण असायला हवे.. साहित्यिक भारत कवितके यांचे मत.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
महाराष्ट्र राज्यातील खाजगी रुग्णालयावर व औषधांच्या कंपन्या वर शासनाचे नियंत्रण असायला हवे, असे मत मुंबई कांदिवली येथील साहित्यिक भारत कवितके यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.भारत कवितके पुढे म्हणाले," नुकतीच पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या असंवेदनशील घटनेने एका महिलेला दोन मुलींना अनाथ करून जीव गमवावा लागला,पुरा महाराष्ट्र हळहळला, डॉक्टरांनी आपला पेशा धर्म समजून करावा, डॉक्टर होण्यासाठी शैक्षणिक बाबतीत खूप आर्थिक बोजा सहन करुन डॉक्टर होतात,हे जरी मान्य असेल तरी डॉक्टरांनी रुग्णांचे आर्थिक शोषण करु नये असे प्रामाणिकपणे वाटते, काही काही वेळा रुग्णांना दाखल केल्यानंतर दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज देताना जे बील होते ते पाहून रुग्णांचा व नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकतो, आयुष्य भराची जमा केलेली पुंजी एका झटक्यात संपून जाते.भविष्याची चिंता सतावत राहते, प्रत्येक खाजगी रुग्णालयात आर्थिक बाबींचा नोटीस फलकावर लावण्यात यावा, रुग्णालयीन वस्तूंच्या किंमतीची नोंद करण्यात यावी.उदा.बेड चार्ज, तपासणी फी,एक्सरे फी, रक्त तपासणी फी, सीटी स्कॅन, औषध गोळ्या, शस्त्रक्रिया वेळी शरीरात बसविण्यात येणाऱ्या साहित्याच्या किंमती, वगैरे वगैरे.खाजगी रुग्णालयात असे ही निदर्शनास येते की त्यांच्याच मेडिकल दुकानांमधून औषधे आणण्यासाठी लिहून दिली जातात.ती वाजवीपेक्षा जास्त,गरजचे पेक्षा जास्त प्रमाणात असतात, रुग्णांना व नातेवाईकांना या बाबतीत काहीच माहित नसते, उरलेल्या वस्तू पुन्हा त्याच मेडिकल दुकानात रवाना केल्या जातात.तसेच मेडिकल दुकानात मागविलेल्या वस्तूंच्या किंमती वर नियंत्रण असायला हवे, एकंदरीत खाजगी रुग्णालयात, औषध कंपनीवर शासनाचे नियंत्रण असायला हवे व रुग्णांची आर्थिक लुट थांबायला हवी.
Comments
Post a Comment