Skip to main content

*चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*



दिनांक २७ एप्रिल रोजी हॉटेल ईशा येथे चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संस्थापक पं. सुरेश साखवळकर  होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सौ . विजया शुक्ला यांनी  मधुर आवाजात ईशस्तवन म्हटले. चंद्रकिरणच्या अध्यक्षा सौ. संगीता पवार यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार श्री. सतीश साठे यांनी पं. सुरेश साखवळकर यांचा परिचय करून दिला, तर गझलकारा नंदिनी काळे यांनी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांची ओळख करून दिली.
सौ. संगीता पवार यांनी कार्यक्रमाचे  अध्यक्ष पं. सुरेश  साखावळकर आणि प्रमुख पाहुण्या डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. चंद्रकिरणच्या कवी व गझलकारा अर्चना मुरुगकर, नंदिनी काळे आणि श्रीराम घडे यांच्या काव्यार्चना, काहूर अंतरीचे व रूमणं या काव्य व गझलसंग्रह प्रकाशनासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.

पं. साखवळकर सरांनी चंद्रकिरण काव्य मंडळाच्या स्थापनेचा आणि त्याच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांतील कवी विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी करून तरुण पिढीला साहित्याशी जोडण्याचे महत्व अधोरेखित केले. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी उत्तम वाचन, रसिकता आणि जाणीवांमध्ये जिवंतपणा फुलवण्याचे महत्त्व स्पष्ट करत काव्यलेखनावर मार्मिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात पीसिईटी इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM च्या निर्मिती प्रमुख RJ माधुरी कुलकर्णी ढमाले यांचा उपाध्यक्ष श्री. श्रीकांत पेंडसे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर RJ माधुरी यांनी "किती बोलतो आपण सारे" ही त्यांची स्वरचित कविता रसिकांसमोर सादर केली.

कार्यक्रमाचे पहिले सत्र काव्य संमेलन म्हणून आणि दुसरे सत्र गझल मुशायर्‍यासाठी आयोजित करण्यात आले. सौ. रश्मी थोरात यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन केले, तर गझल मुशायऱ्याचे संचालन सौ. अर्चना मुरुगकर यांनी नेटकेपणाने पार पाडले.
श्री. श्रीकृष्ण मुळे यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. दत्तात्रेय मेढी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्षा सौ. संगीता पवार, कार्यवाह सौ रश्मी थोरात,  सहकार्यवाह सौ. माधवी खडक्कार, खजिनदार श्री सतीश साठे, श्री. श्रीकृष्ण मुळे आणि श्री. श्रीराम घडे यांनी मोलाचे योगदान दिले.

चंद्रकिरण काव्य मंडळाचा हा ३१ वा वर्धापन दिन रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि साहित्यिक वातावरणात संस्मरणीय ठरला.


---

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...