Skip to main content

*आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज*

====================
*१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.*
         *कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.* 
                 *आज  सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढून सामाजिक शैक्षणिक सहिष्णुता साध्य केली.पुरोहित कार्य विशिष्ठ समाजाची मक्तेदारी राहु नये म्हणुन वैदिक शाळा काढल्या.गोसावी,शिंपी,कोष्टी,जंगम,लिंगायत मुलांना पुजापाठ शिक्षण देवुन पुरोहितांची वैदिक हुकुमशाहीला त्यांनी सुरुंग लावला.*
          *केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक समाजसुधारणाही लोकराजांनी केल्या.विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी विधवा पुनरविवाह,सतीप्रथा बंद,पडदा पध्दतीला विरोध,बहुपत्नीत्वाला विरोध करुन संस्थानात कायदे केले.सामाजिक न्यायासाठी लोक अदालती भरवुन गुन्हेगारास शासन दिले.*
           *सामाजिक आरक्षणाची सुरुवात प्रथम लागु करुन बहुजण पोरांना सामाजिक न्याय मिळवुन दिला.पन्नास टक्के जागा राखिव ठेवल्या.वंचित,दुर्बल,पिचलेल्या,गंजलेल्या समाजास सामाजिक विकासाची संधी उपलब्ध केली.विकासाच्या मुख्यः प्रवाहात सामील करुन घेतले.त्यांना नोकर्‍या दिल्या.*
            *सामाजिक बरोबर धार्मिक सुधारणा केल्या.सत्यशोधक समाज व आर्य समाज यांच्या शाखा कोल्हापुर संस्थानात काढल्या.धार्मिक कर्मकांड,वेदोक्त पुजापाठ,यज्ञ,बळी,अंधश्रध्दा याला कडाडुन विरोध केला.देव आणि भक्त यांच्या मधला "दलाल पुरोहित" ही व्यवस्थाच त्यांनी नष्ट केली.बहुजनांची लग्न,अत्यंसंस्कार हे गोसावी,जंगम समाजाकडुन करुन घ्यावे असा आदेश काढला.*
           *काही अर्थिक,भौतिक सुधारणा संस्थानात करायला सुरुवात केली.उद्योगास चालना दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही म्हणुन मोठे उद्योग सुरु केले.कारखानदारीस चालना दिली.सुतगिरण्या,तेलगिरण्या,कापड उद्योग,मसाला,धातु उद्योग,इ.कारखाने निर्माण केले."राधानगरी" धरण बांधुन स्वतंत्र पाटबंधारे ,जलसंपदा खाते निर्माण केले.शेततलाव,तळी,बंधारे बांधून जमिनी आणि संस्थान सिंचनाखाली आणले.पर्यावरणाची काळजी घेतली.*
       *कला व कलाकारांना पुरस्कार दिले.कुस्त्यांचे फड उभा केले.गायन,हस्तकला,संगित,वादन,शिल्पकला,वास्तुकला यांची पुनर् बांधणी केली.कलाकारानां सन्मानाने जगण्यासाठी विशेष भत्ते दिले.कला जीवंत राहिल्या पाहिजे म्हणुन अनुदान आणि कला संस्था उभा केल्या.आजपण कुस्त्यांचे माहेरघर म्हणुन कोल्हापुर संस्थानाची ओळख आहे.ही कृपा शाहु राजांची होती.*
            *कोहिनुर हिरा खुप प्रसिध्द आहे.हा हिरा कोल्हापुर संस्थानास सापडला,तो हिरा म्हणजे सामाजिक आरक्षणाचे जनक लोककल्याण कारी राजर्षी शाहु महाराज होय.त्यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन*
     *स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय यांची कोल्हापुर संस्थानात सुरुवात करणार्‍या या लोककल्याण कारी भिष्मपितामहास त्रिवार वंदन.*
    👏👏🌹🌹🌹👏👏
  
    *आपलाच स्नेहांकित*
====================
*श्री.पंकज राजेंद्र काटकर*
*मु.पो.काटी.ता.तुळजापुर*
         *जि.धाराशिव*
          *सहशिक्षक*
जि.प.प्रा.शाळा काटी .ता.तुळजापुर
मो.नं.-९७६४५६१८८१

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...