Skip to main content

*आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज*

====================
*१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.*
         *कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.* 
                 *आज  सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढून सामाजिक शैक्षणिक सहिष्णुता साध्य केली.पुरोहित कार्य विशिष्ठ समाजाची मक्तेदारी राहु नये म्हणुन वैदिक शाळा काढल्या.गोसावी,शिंपी,कोष्टी,जंगम,लिंगायत मुलांना पुजापाठ शिक्षण देवुन पुरोहितांची वैदिक हुकुमशाहीला त्यांनी सुरुंग लावला.*
          *केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक समाजसुधारणाही लोकराजांनी केल्या.विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी विधवा पुनरविवाह,सतीप्रथा बंद,पडदा पध्दतीला विरोध,बहुपत्नीत्वाला विरोध करुन संस्थानात कायदे केले.सामाजिक न्यायासाठी लोक अदालती भरवुन गुन्हेगारास शासन दिले.*
           *सामाजिक आरक्षणाची सुरुवात प्रथम लागु करुन बहुजण पोरांना सामाजिक न्याय मिळवुन दिला.पन्नास टक्के जागा राखिव ठेवल्या.वंचित,दुर्बल,पिचलेल्या,गंजलेल्या समाजास सामाजिक विकासाची संधी उपलब्ध केली.विकासाच्या मुख्यः प्रवाहात सामील करुन घेतले.त्यांना नोकर्‍या दिल्या.*
            *सामाजिक बरोबर धार्मिक सुधारणा केल्या.सत्यशोधक समाज व आर्य समाज यांच्या शाखा कोल्हापुर संस्थानात काढल्या.धार्मिक कर्मकांड,वेदोक्त पुजापाठ,यज्ञ,बळी,अंधश्रध्दा याला कडाडुन विरोध केला.देव आणि भक्त यांच्या मधला "दलाल पुरोहित" ही व्यवस्थाच त्यांनी नष्ट केली.बहुजनांची लग्न,अत्यंसंस्कार हे गोसावी,जंगम समाजाकडुन करुन घ्यावे असा आदेश काढला.*
           *काही अर्थिक,भौतिक सुधारणा संस्थानात करायला सुरुवात केली.उद्योगास चालना दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही म्हणुन मोठे उद्योग सुरु केले.कारखानदारीस चालना दिली.सुतगिरण्या,तेलगिरण्या,कापड उद्योग,मसाला,धातु उद्योग,इ.कारखाने निर्माण केले."राधानगरी" धरण बांधुन स्वतंत्र पाटबंधारे ,जलसंपदा खाते निर्माण केले.शेततलाव,तळी,बंधारे बांधून जमिनी आणि संस्थान सिंचनाखाली आणले.पर्यावरणाची काळजी घेतली.*
       *कला व कलाकारांना पुरस्कार दिले.कुस्त्यांचे फड उभा केले.गायन,हस्तकला,संगित,वादन,शिल्पकला,वास्तुकला यांची पुनर् बांधणी केली.कलाकारानां सन्मानाने जगण्यासाठी विशेष भत्ते दिले.कला जीवंत राहिल्या पाहिजे म्हणुन अनुदान आणि कला संस्था उभा केल्या.आजपण कुस्त्यांचे माहेरघर म्हणुन कोल्हापुर संस्थानाची ओळख आहे.ही कृपा शाहु राजांची होती.*
            *कोहिनुर हिरा खुप प्रसिध्द आहे.हा हिरा कोल्हापुर संस्थानास सापडला,तो हिरा म्हणजे सामाजिक आरक्षणाचे जनक लोककल्याण कारी राजर्षी शाहु महाराज होय.त्यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन*
     *स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय यांची कोल्हापुर संस्थानात सुरुवात करणार्‍या या लोककल्याण कारी भिष्मपितामहास त्रिवार वंदन.*
    👏👏🌹🌹🌹👏👏
  
    *आपलाच स्नेहांकित*
====================
*श्री.पंकज राजेंद्र काटकर*
*मु.पो.काटी.ता.तुळजापुर*
         *जि.धाराशिव*
          *सहशिक्षक*
जि.प.प्रा.शाळा काटी .ता.तुळजापुर
मो.नं.-९७६४५६१८८१

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...