सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आजारांची सुरवात आपल्याला ओळखता आली पाहिजे . बरेचदा अस होत की आपल्याला आजाराची ओळख नसते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करून आजार तसाच वाढू देतो. ज्या मुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . सुरवातीला आपण आजार ओळखून त्याची चिकित्सा केली तर तो भविष्यामध्ये आपल्याला त्रास देणार नाही याची मात्र खात्री आहे .
सदर लेखात आपण बघणार आहो की कोण कोणते लक्षण आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या आजारानंमध्ये मुळात याचे भरपूर प्रकार आहेत. परंतु जास्त प्रमाणात आपल्याला तीन प्रकार जास्त बघायला मिळतात. एक म्हणजे फिशर यालाच संस्कृत भाषेत परिकर्तिका असे म्हणतात . यामध्ये मल (गुदमार्ग)मार्गावर चीर पडल्या जाते ज्या मुळे मलविसर्जन च्या वेळी जळजळ होणे ,रक्तस्त्राव होणे ,मल ला लागून रक्त येणे असे काही लक्षण दिसून येतात . याचे मुख्य कारण मलअवरोध व बध्दकोष्ठ आहे . मल थांबून ठेवणे किंवा पोट साफ न होणे यामुळे हे वाढत जाते . दुसरा म्हणजे मूळव्याध ज्यामध्ये मल मार्गावर आपल्याला मासाची गाठी बाहेर आल्यासारखे वाटते . मल विसर्जन च्या वेळी स्पर्श जाणवतो .जास्त मोठे असल्यास रक्तस्त्राव होतो. तिसरे म्हणजे भगंदर हा दीर्घकाळ असणारा आजार आहे. या मध्ये गुदमार्ग सोडून त्याच्या अवतीभवती गाठ तयार होते .जी कालांतराने व्रण रूप धारण करते ज्यामध्ये पस, रक्त्रस्रावच समावेश असतो . ही आतमध्ये मार्ग तयार करत जाते ज्या मुळे भगंदर तयार होते . याचे निदान जर सुरवातीला नाही लागले तर हा मार्ग पुन्हा वेगवेगळे मार्ग तयार करतो . एका वेळीस मोठ मोठे अनेक भगंदर तयार होतात. हा त्रास असहनीय असतो . ज्या मध्ये रुग्णाला अतिशय जास्त पिडा असते . त्यामुळे अशी वेळ न यावी म्हणून आधीच यामध्ये काहीही लक्षण तुम्हाला आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि खूप वेळे पर्यंत वाट न बघता याची तपासणी करावी .
डॉ. तेजश्री बनसोड
(एम एस शल्यतंत्र )
Comments
Post a Comment