Skip to main content

मूळव्याध भगंदर होण्याचे लक्षणे !

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आजारांची सुरवात आपल्याला ओळखता आली पाहिजे . बरेचदा अस होत की आपल्याला आजाराची ओळख नसते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करून आजार तसाच वाढू देतो. ज्या मुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . सुरवातीला आपण आजार ओळखून त्याची चिकित्सा केली तर तो भविष्यामध्ये आपल्याला त्रास देणार नाही याची मात्र खात्री आहे . 
सदर लेखात आपण बघणार आहो की कोण कोणते लक्षण आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या आजारानंमध्ये मुळात याचे भरपूर प्रकार आहेत. परंतु जास्त प्रमाणात आपल्याला तीन प्रकार जास्त बघायला मिळतात. एक म्हणजे फिशर यालाच संस्कृत भाषेत परिकर्तिका असे म्हणतात . यामध्ये मल (गुदमार्ग)मार्गावर चीर पडल्या जाते ज्या मुळे मलविसर्जन च्या वेळी जळजळ होणे ,रक्तस्त्राव होणे ,मल ला लागून रक्त येणे असे काही लक्षण दिसून येतात . याचे मुख्य कारण मलअवरोध व बध्दकोष्ठ  आहे . मल थांबून ठेवणे किंवा पोट साफ न होणे यामुळे हे वाढत जाते . दुसरा म्हणजे मूळव्याध ज्यामध्ये मल मार्गावर आपल्याला मासाची गाठी बाहेर आल्यासारखे वाटते . मल विसर्जन च्या वेळी स्पर्श जाणवतो .जास्त मोठे असल्यास रक्तस्त्राव होतो. तिसरे म्हणजे भगंदर हा दीर्घकाळ असणारा आजार आहे. या मध्ये गुदमार्ग सोडून त्याच्या अवतीभवती गाठ तयार होते .जी कालांतराने व्रण रूप धारण करते ज्यामध्ये पस, रक्त्रस्रावच समावेश असतो . ही आतमध्ये मार्ग तयार करत जाते ज्या मुळे भगंदर तयार होते . याचे निदान जर सुरवातीला नाही लागले तर हा मार्ग पुन्हा वेगवेगळे मार्ग तयार करतो . एका वेळीस मोठ मोठे अनेक भगंदर तयार होतात. हा त्रास असहनीय असतो . ज्या मध्ये रुग्णाला अतिशय जास्त पिडा असते . त्यामुळे अशी वेळ न यावी म्हणून आधीच यामध्ये काहीही लक्षण तुम्हाला आढळल्यास लगेच डॉक्टरांचा  सल्ला घ्यावा आणि खूप वेळे पर्यंत वाट न बघता याची तपासणी करावी . 

डॉ. तेजश्री बनसोड 
(एम एस शल्यतंत्र )

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...