Skip to main content

Posts

ऐन दिवाळीत शिक्षकांची गळचेपी

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांना निवडणूक कार्यासाठी शाळेतून कार्यमुक्त केले. घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमने बिचाऱ्या शिक्षकांची अवस्था झाली आहे. 3 दिवस शाळा आणि 3 दिवस निवडणूक कार्य अशी तारेवरची कसरत करत गेले 2 महिने शिक्षक करत आहेत. 3 दिवस शालेय कार्य करत असताना त्यांना शालेय जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून, सहामाही परीक्षा घेऊन निकालही लावून दिले. आणि आता ऐन दिवाळीत जेव्हा सर्व सणाच्या तयारीत आहेत तेव्हा हेच शिक्षक दारोदार भटकून मतदान करा म्हणून जन जागृती करत आहेत. यावरून हे सिद्ध होते की आपल्या समाजात शिक्षक - विद्यार्थी आणि शिक्षणाची कदर नाही.  प्रत्येक अशैक्षणिक कार्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांनाच सक्तीने शाळा सोडून त्या कामासाठी जुंपले जाते. आणि शैक्षणिक दर्जा घसरत चालला आहे म्हणून बोंब मारणारे प्रशासनातील अधिकारीच या साठी प्रथम जबाबदार आहेत. शिक्षक शाळेत शिकवू शकत नसेल तर शैक्षणिक दर्जा उंचावणार तरी कसा? शिक्षण मिळवणे हा राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. म्हणून कोट्यावधी रुपये मोफत शिक्षणास...

शिर्डी बसस्थानकात धुरीमुळे प्रवाशांची डोळे दुःखी.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. शिर्डी महाराष्ट्र राज्यातील एक तिर्थक्षेत्र असलेले सतत साईभक्तांची वर्दळ असलेले एक प्रसिद्ध शहर.या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भव्य दिव्य आकर्षक असे बस स्थानक बांधले . प्रवाशांना सुखसोयी युक्त असे शिर्डी चे बस स्थानक आहे.पण या बस स्थानकात तीन फेरीवाले आपल्या चणे , शेंगदाणे व इतर वस्तू विक्रीसाठी एका मडक्यात लाकडे, कोळसा जाळून चणे शेंगदाणे गरम करून विकत असतात,पण त्या धुराने स्थानकातील प्रवाशांना त्रास होतो, धुराने डोळे चुरचुर करतात, कोणी प्रवाशांनी त्यांची तक्रार केली तर ते उध्दट बोलतात, तरी येथील स्थानिक राज्य परिवहन महामंडळाने या बाबतीत लक्ष घालून या फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा प्रवाशी वर्गाचा एक ना एक दिवस उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.लवकरात लवकर या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा,व प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा.

माझ्या धनगर समाजासाठी थोडं.... भारत कवितके

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  आता विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्या आहेत, कोणत्याही पक्षाला, नेत्याला वाईट बोलू नका, सत्ताधारी असो वा विरोधी पक्षनेते सर्वांनी आपल्या धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी चे घोंगडे भिजत ठेवले आहे.हे मान्य आहे,पण आपली लोकसंख्या दोन अडीच कोटी आहे म्हणतात तर आपले राजकीय नेतृत्व निर्माण का झाले नाही? याला जबाबदार राजकारणी तर आहेतच पण आपण सर्व जण ही तितकेच जबाबदार आहेत.धनगर समाजानी मनात आणले तर नक्की राजकीय घडामोडी मध्ये परिवर्तन होऊन आपला धनगर समाज राज्य कर्ता समाज म्हणून नक्कीच पुढे येईल.यात शंका नाही.या निवडणूकी मध्ये धनगर समाजाच्या उमेदवारास निवडून आणायची जबाबदारी तुमच्या आमच्या वर राहील.जो पर्यंत तुम्ही राजकीय नेतृत्व निर्माण करणार नाही तोपर्यंत तुमचे एसटी आरक्षण अमंलबजावणी सारखे प्रश्न सोडविणे कठीण आहे.कोणाचेही कोणी उणे धुणे धुत बसून वेळ वाया घालवू नका.फक्त धनगर समाजाच्या उमेदवाराचा प्रचार व प्रसार करा.वेळ फार थोडा आहे.रात्र दुश्मनाची आहे,काफील राहू नका.प्रत्येक वेळी संधी सोने घेऊन येईलच हे सांगता येत नाही पण आलेल्या संधीचे सोने करण्याचे ...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...

माणूस म्हणून जगा व जगू द्या...

        नऊ दिवस झाली तुझी मोठ्या थाटामाटात पुजा.या काळात मिळाला तुझ्या काहीं भगिनींना मानसन्मान.त्या किती ग २०% ही नसतील .पण,उरलेल्या ८०% महिलांचे काय? समानताच नांदतांना दिसत नाही... दिसतो सोयराचार...बोलले तर फार बोलते? किंवा बोलतो?आवाज दाबायचा,प्रकरणे दाबायची,अन् बे एके बे, पाढा पुढे चालू.... असे कित्येक वर्षे गेले,अन् अजून असेच कित्येक वर्षे जातील? तिला न्याय कधी मिळणार? समानता कधी मिळणार? प्रश्न टांगणीला राहणार..पुन्हा हे रहाटगाडगे चालू... हे असेच चालायचे. कोणाला आईच्या दुधाची किंमत तर समजली पाहिजे ना? एका महिलेला दुसऱ्या महिलेची किंमत जेव्हा समजेल ना तेव्हा कोठे समाज जागृत होईल. तीच तिची वैरी बनते.किंवा दाखविली जाते,की भासावली जाते? की, खरचं ९० % महिलाच याला कारणीभूत असतील.जेव्हा आई म्हणून नाही तर एक महिला म्हणून विनाकारण त्रास देणाऱ्या मुलाला तेथेच शिक्षा करावी म्हणजे असे हिंसक राक्षस वाढणार नाहीत.कितीतरी दुर्घटना घडल्या असतील या १० दिवसात,पण,त्या उघड नाही केल्या गेल्या..कारण नऊ दिवस नवरात्र होती ना?...उपभोग म्हणून किती दिवस तिच्याकडे असे पाहणार काही...

समाजातील कर्तृत्ववान महिला

स्त्री ही बहीण ,आई, पत्नी, मुलगी अशा वेगवेगळ्या रूपात आपणास पाहावयास मिळते आजकाल खुरपणी पासून ते नासापर्यंत स्त्रिया कार्यरत आहे ,पुरुषापेक्षा जास्त ताणतणावात स्त्रियाच असतात त्यामुळे त्यांना किडनीचे आजार अधिक प्रमाणात होतात,अनेक गोरगरीब महीलाचे किडनी फेल प्रमाण अधिक असून त्यांच्या उपचारासाठी मी.नेहमीच मदत करत आसतो,आपले घर सांभाळून नोकरी करून मुलावर योग्य संस्कार करते ती आई असते         आजच्या स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले, त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला मनाचा प्रकाश, फुले, आगरकर, कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून तिला विद्यालयाची कवाडे उघडी झाली. पाटी पेन्सिल हातात घेतलेल्या स्त्रीने अगदी अल्प काळात विद्यापीठाच्या अंतिम परीक्षाही पार केल्या. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटी त पुढे आहे. कोणतेही काम तिला अशक्य राहिले नाही. अंतराळातील जाऊन पोहोचली. राजकारण, समाजकारण, शिक्षण सर्व क्षेत्र तिने यशस्वीरित्या पार केली. पण हे झाले असामान्य स्त्रीबाबत. सर्वसामान्य स्त्रीबाबत काय आढळते? ती पण सुविद्य झाली...

शीर्षक :- स्री मध्ये असते शक्ती अपार.

इतिहास आहे साक्षीदार रणरागिणीने शत्रू तुडवला शूर राणी लक्ष्मीबाईंनीच झाशीचा किल्ला लढवला...        मानवी प्राण्यात दोन प्रमुख जाती,त्या म्हणजे स्री व पुरुष.दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण.मानवी जीवन जर आपल्याला पृथ्वीतलावर हवे असेल तर या दोन्ही जाती टिकल्या पाहिजे,बहरल्या, फुलल्या पाहिजे.जीवन म्हणजे रथ आणि रथाची ही दोन्ही भक्कम चाके.जीवन सुरळीत,सुरक्षित चालण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित,सुरक्षित,समानतेने चालली गेली पाहिजे.त्यासाठी महिला शिक्षितe होणे गरजेचे आहे."मेणाहून मऊ व वज्राहून कठीण महिला आहे".ती एकाच वेळी असंख्य कामे करत असते. "शिकलेली आई घरादाराला पुढे नेई ",असे, त्यामुळेच तर म्हटले जाते.सामर्थ्य,मातृत्व,दातृत्व,नेतृत्व,श्रद्धा,प्रेम, माया,शील,सहनशीलता,सेवा,समाशिलता इत्यादी गुणांचा तीe संपन्नशिल,वैभवशाली ठेवा,खजिना आहे. वार नाही तलवार आहे... ती समशेरची धार आहे... ती सबला नार आहे... ती धगधगता अंगार आहे... ती सृजनशील विचार आहे... ती प्रगतीचा उंच आलेख आहे... ती विश्वाची जननी आहे..3            इतिहासातही डोकावून पाहिले तर अ...