*शेती मातीच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातुन उमटायला हवे**१३ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांचे आवाहन**साहित्य, भाषा व संस्कृती संशोधन केंद्रासाठी आमदार खोसकर यांनी केला एक कोटीचा निधी जाहिर**कावनई मध्ये केंद्र उभारणीसाठी जागा देण्याची सरपंच गोपाळ पाटिल यांची घोषणा*
*आहुर्ली प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन* -------- साहित्य हे वास्तवाशी निगडीत असावे.सामान्य माणसाला केंद्रबिंदु ठेवुन त्याच्या जगण्याचा संघर्ष साहित्यात यायला हवा. सत्तेचे गुलाम नको, भांडवलदाराच्यां हातचे बाहुल नको, तर प्रस्थापितानां देशोधडीला लावणार्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष हवा. हे खरे साहित्य.शेती मातीचा लढा साहित्यातुन प्रतिबिंबित होऊन व्यवस्थेला हादरा देणारं साहित्य हवं असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने मोडाळे ता.ईगतपुरी येथे आयोजीत १३ वे नवोदिताचें व ग्रामिण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, सुप्रसिध्द साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले. व्यासपिठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे, आमदार हिरामण खोसकर, स्वागताध्यक्ष गोरख बोडके, जेष्ठ साहित्यिक तथा परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष देविदास खडताळे, परियदेचे संघटक अमोल कुंभार, उद्योगपती तानाजी गायकवाड, अभिनेते तथा साहित्यिक अजय बिरारी,लेखक प्रशांत कोतकर जळगाव, दिलीप कजगावकर, माणिकराव गोडसे, पुंजाजी मालुंजकर, न्या.सलंत पाटिल, परिषदेचे उत्तर म...