Skip to main content

Posts

महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन व पोलीस यांचा वचक राहिला नाही... पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली

सध्या महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन आणि पोलीस यांचा पाहिजे तसा वचक राहिला नाही असे प्रतिपादन मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.संतोष देशमुख निघृण हत्या, कैलास बोराडे यांच्या शरीरावर दिलेल लोखंडी रॉड चे चटके, स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अन्याय, वगैरे वगैरे घटनांनी लोक हादरलेले आहेत,अशा घटना म्हणजे राज्याला एक प्रकारे लागलेला कलंक आहे,या घटनेतील काही आरोपी पोलिसांना अजून सापडलेले नाहीत,ही अत्यंत खेदाची बाब आहे, अन्याय झालेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची आहे ,यांचा विचार न करता ती एक व्यक्ती आहे,यांची जाणीव ठेवावी.माणुसकीला काळीमा फासणारी घटना, संवेदनशील मनाचा थरकाप उडविते, ज्या समाजातील व्यक्ती वर अशा प्रकारे अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने त्याचा समाज उभा राहून न्याय मागत असेल तर बिघडले कुठे? पोलीस व शासन यांनी यांना आवर नाही घातला तर ते आणखी निर्भिड,बेडर होऊन दुसरे गुन्हे करतील.अशा गुन्हेगारांना वेळी च अटक करुन कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,

काव्य दरबार उरण.. पोपटी कवी संमेलन

   नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार      काव्य दरबार उरणचे दरमहा मासिक कवी संमेलन संस्थापक-  श्री. के. एम्. मढवी यांच्या चिर्ले येथील "सुपारी बाग" या निवासस्थानी आयोजित केले जाते. सदर कवी संमेलनाचे *हिरक महोत्सवी पोपटी कवी संमेलन व पुरस्कार वितरणाचे आयोजन संस्थापक के. एम्. मढवी यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ०२ मार्च, २०२५ रोजी सकाळी- १०:३० ते सायंकाळी- ०५:३० या वेळेत करण्यात आले.      सर्वप्रथम व्यासपीठ निश्चिती कवी/गायक अरुण द. म्हात्रे यांनी केली. त्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि साई मंदिर वहाळचे विश्वस्त लोकप्रिय माननीय रवीशेठ पाटील साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त, धडाडीचे समाज कार्यकर्ते माननीय भूषण पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच रत्न साहेब, चंद्रकांत पाटील जी, रामचंद्र म्हात्रे जी, आणि संस्थापक के. एम्. मढवी साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने व्यासपीठाला विशेष शोभा आली.        व्यासपीठ निश्चितीनंतर मान्यवरांच्या हस्...

कृषकाच्या अंतरीची व्यथा मांडणारा काव्यसंग्रह: रूमणं

            ग्रामजीवनातून वर आलेले आणि ग्रामीणतेशी जवळीक असणारे अनेक साहित्यिक साहित्याच्या माध्यमातून ग्रामजीवनाचे सर्वांग सुंदर  चित्र रेखाटताना  आढळतात. त्यातीलच एक उदयोन्मुख कवी श्रीराम घडे यांचा नामोल्लेख करावा लागेल मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या आणि त्या लोकप्रिय ही झाल्या विशेषता ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण कवितेला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे .याच परंपरेचे समृद्धीकरण  करणारी साहित्यिकांची नवी पिढी  साहित्याच्या क्षेत्रात आश्वासक साहित्य निर्मितीचे कार्य   करीत आहेत .आणि त्यांच्या साहित्याचा वाचक वर्ग ही गुण दोषा सहित स्वीकार करतात .अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार खेडयापाड्यातही झपाट्याने झाला आणि खेड्यातल्या खेडूत माणसाच्या जगण्याचे चित्र बदलू लागले .अनेक खेड्यातील सुशिक्षितांची पिढी शहराकडे धाव घेऊ लागली  नोकरीच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असणारी  ही सुशिक्षित पिढी  खेड्यातील जनजीवन  ,शेत -शिवार ,गुरंढोरं , पेरणी, कुळवणी ,नांगरली ,काढणी मळणी , ख...

मराठी भाषा गौरव दिन निमित्त विशेष कार्यक्रमात कवयित्री,लेखिका हिरकणी सौ.अनिता गुजर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित....

डोंबिवलीतील नामांकित  डॉन बॉस्को शाळेतर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन निमित्त विशेष कार्यक्रमात कवयित्री,लेखिका  हिरकणी सौ.अनिता गुजर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले.  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेनी ब्राईट  ,शाळेच्या मराठी  वाङ्मय मंडळाचे प्रमुख श्री.पद्माकर भावे सर, यांच्या नियोजनाखाली शाळेतील मुलांकडून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या,नृत्य,गायन,नाटुकली,काव्यवाचन,अशा विविध कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराष्ट्र गीत सादर करून झाली. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन  छोट्या मुलांनीच केले. या सर्व लहान मुलांचे कौशल्य बघून कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या... आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी.... सौ.मेघा पोतनीस मॅडम,सौ.ज्योती माटे मॅडम,धनश्री मॅडम,वैशाली मॅडम  तसेच इतर सर्व शिक्षिकांच्या सहकार्याने कार्यक्रम दणक्यात पार पडला.

चेंबूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या २० व्या वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  चेंबूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या २० वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे संघाचे अध्यक्ष लक्ष्मण व्हटकर यांनी कळविले आहे, रविवार दिनांक २मार्च २०२५ रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत चेंबूर पूर्व येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर मुंबई ७१ या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ मुंबई यांच्या २० वर्धापनदिना निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी,स्व.शिवाजीराव ( बापू) शेंडगे यांची पुण्यतिथी,समाज बंधु भगिनी साठी स्नेहसंमेलन सोहळा, वधुवर सूचक पालक परिचय मेळावा, शब्द जादूगार प्रा.डाॅ.सुनील रुपचंद धनगर यांचे व्याख्यान, मान्यवरांचे स्वागत व सत्कार,अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घाटक विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, प्रमुख पाहुणे क्रीडा आणि अल्प संख्याक विकास मंत्री आणि प्रमुख अतिथी आमदार नारायण आबा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, आमदार उत्तमराव जानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, पुण्यश...

बोरीवली येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या महाभंडाराचे आयोजन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. बोरीवली पूर्व येथे सद्गुरू संत श्री बाळूमामा यांच्या महाभंडाराचे आयोजन करण्यात आले आहे, शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी जय मल्हार मित्र मंडळ बोरीवली व्दारा शिवाजी नगर रहिवासी संघ, हनुमान टेकडी, काजू पाडा, बोरीवली पूर्व मुंबई ६६ या ठिकाणी सद्गुरू संत श्री बाळूमामा यांच्या महाभंडाराचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ७ वाजता आरती व महाभंडारा, सायंकाळी ७:३० वाजता मान्यवरांचे स्वागत,व रात्री ८ ते १० या वेळेत धनगरी ओव्यांचा रंगतदार, जल्लोषात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या प्रसंगी भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार मित्र नातेवाईक सह उपस्थित राहून सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचे दर्शन घेऊन महाभंडाराचा लाभ घ्यावा असे जय मल्हार मित्र मंडळा मार्फत कळविले आहे.

अनिका पिकॅडिली मध्ये शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न

पुनावळे बाजार, पुनावळे, पुणे- हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त अनिका पिकॅडिली रहिवासीयांनी सुंदर असा शिव जन्मोत्सव सोहळा आयोजित केला. सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिव पूजन  करण्यात आले.छत्रपतींची आरती करण्यात आली.तदनंतर  शिव जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल अनेकांनी मनोगत व्यक्त केले. "राजं आलं, राजं आलं", अनुज अभिजित ढोली याने यावर नृत्य सादर केले. सौ. माधुरी वैद्य कुमठेकर यांनी ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा कुमठेकर यांनी लिहीलेली छत्रपती शिवराय यांच्यावरील गौरवपर रचना म्हटली. लहान मुलामुलींची  चित्रकला स्पर्धा झाली.  युवा व्याख्याते श्री शुभम मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. ते एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलेपर म्हणून काम करतात. व्याख्यानाच्या मानधनातून ते गड किल्ले यांची स्वच्छता आणि संवर्धन काम करतात. तसेच चिंचवड येथील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पुरविण्याचे कार्य करतात. वयाच्या १६ व्या वर्षापासू...