Skip to main content

Posts

नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार - २०२४ सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

 प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मुंबई वांद्रा पश्चिम येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता  विविध क्षेत्रतील मानवरांना  प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले ' उद्घाटक  साहित्यिक आणि उपाध्यक्ष सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य  डॉ. खं . रं . माळवे खरमा . मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आले . बी. पी . ई . हायस्कूल बान्द्रा या मुलींनी स्वागत गीत सादर केले .  स्वागताध्यक्ष आणि  कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे मुंबई यांनी आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिका वाचन केले आणि  त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले .  आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ डी .जी  यादव डॉ डेरिक एंजल्स ' डॉ सुकृत खांडेकर ' श्री भानुदास केसरे ' प्रमोद महाडीक ' रामकृष्ण कोळवणकर ' राजीव कांबळे , डॉ गॅन्सी अल्बुकर्क आदि मान्यवर उपस्थितीत ...

*स्व परिचय*

 *1)पूर्ण नाव:*  *श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे*   *2) सध्या राहत असलेला पत्ता:-* *मोरेश्वर कॉम्प्लेक्स, D-403, सेक्टर-* *18, कामोठे, नवी मुंबई ,*   *तालुका: पनवेल,*   *जिल्हा:रायगड.*  *3) मूळ गाव.*      *मुक्काम पोस्ट:  पाडळी दर्या,*       *तालुका: पारनेर*       *जिल्हा: अहमदनगर*  *4)शिक्षण*: *DSM,BABED.*   *5)वय : 56*  *6)पद*: *सहाय्यक शिक्षक*  *7) शाळा ,नाव, पत्ता*:        *मोहिते पाटील विद्यालय,*          *वीर तानाजी भोसले मार्ग*          *पनवेल घाटकोपर लिंक रोड,*           *मोहिते पाटील नगर,*            *मानखुर्द, मुंबई- ४०००४३*  *8) नोकरी करत असाल तर,एकूण नोकरी.*: *२६*  *9) शासनाकडून / किंवा इतर फाउंडेशनकडून मिळालेले पुरस्कार नावे..*  *इतर फाऊंडेशन/ सामाजिक संस्थे* *कडून मिळालेले पुरस्कार* *संख्या - २१...

*नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन* *विशेष लेख*

*लेखिका* *अनुपमा जाधव* *उपक्रमशील, आदर्श शिक्षिका,* *शाळा..के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू*    श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो.भाऊ बहिणीच्या या पवित्र प्रेमाला राखी पौर्णिमेच्या दिवशी जणू उधाणचं येते.या दिवशी बहिण सुंदर पाट मांडते.पाटाभोवती विविध कलाकुसरतेने रांगोळी काढते.व भावाला ओवाळण्यासाठी ताटाची आकर्षक सजावट करते.भावाच्या कपाळावर कुंकू, अक्षदा लावते.व त्याला ओवाळते, राखी बांधते.मिठाई भरवते. भावाचे तोंड गोड करते.मग भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या ताटात पैसे, भेट वस्तू देतो.त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन खूष ठेवतो.            आपल्या भावाची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्याने बहिणीचे रक्षण करावे.ही त्यामागची भावना असते.आपला भाऊ सुखी, समाधानी, आनंदी असावा.त्याने आपल्या आई वडिलांचा ,परीवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक बहिणीला वाटत असते. तसेच आपल्या बहिणीला ही कोणत्याही प्रकारची उणिव भासू नये यासाठी भाऊ तिला एखाद्या फुलाप्रमाणे जपत असतो.एवढं राखीच्या धाग्याचं महत्त्व आहे. ...

पार(स्वा)तंत्र्य

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या  पूर्व संधेला घडली एक अघटित घटना  कोलकात्यातील एका डॉक्टर भगिनीचा  करुनी विनयभंग खून केला काही  नराधमानी  आज मी विचारतो एक प्रश्न तुम्हा सर्वांना  आहोत का तुम्ही -आम्ही खरोखरच स्वतंत्र ?  सडलेली आमची डोकी शोधत असतात  पीडितेची जात आणि आरोपीचा धर्म  आहे आमचा प्रधान आंधळा गृहमंत्र्याचे आहेत कान बहिरे  न्याय कसा मागावा न्याय देवतेला  आहे इथली व्यवस्था भ्रष्ट आणि लाचार  बुरसटलेल्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या  आहेत साक्षीदार घटना हजार  आहे स्वतंत्र फसवे  या देशाचे, भगिनी आहेत असुरक्षित आणि युवा बेरोजगार  झाले आहे माझे मन बधिर आणि सुन्न  नाही साजरा करणार मी आता स्वातंत्र्य दिन  देश अजूनही आहे पारतंत्र्यात  उगवेल ती ही सोनेरी पहाट  होऊनी सुजाण नागरिक  घेऊ आपण सर्वजण मोकळा श्वास  कवी भूषण सुकेशनी वामनराव

*देशभक्ती...*

  उद्या 15 ऑगस्ट...दिवसभर नदीला  पूर यावा तसे सगळीकडून देशभक्तीचे मेसेज एकामागून एक सर्वांना येत राहणार..कोण चौकात गाणे वाजवणार, कोण पूजा ठेवणार , कोण गाड्यावरून,सायकल वरून झेंडे मिरवणार...यात वाईट असे काहीच नाही. उलट आजही आपली देशभक्ती प्रत्येकात शाबूत आहे याचे हे उदाहरण आहे.  पण हीच देशभक्ती आपल्या रोजच्या वागण्यात का? येत नाही ...जेव्हा देशात आतंकवादी हल्ला होतो तेव्हा सगळा देश संतापात शोकात असतो, सगळी यंत्रणा अचानक जागी होते.. कोणाला तरी पकडले जाते..पण हल्ला यशस्वी झाला म्हणजे त्यांचे काम फत्ते झाले असे होते.त्यांना मरणाची भीती नसते..कारण त्यांचा ब्रेन आधीच वॉश केलेला असतो...आपल्याला स्वर्ग प्राप्त होणार आहे याची त्यांना त्यांच्या आका ने हमी दिलेली असते (त्यांच्या भावनेचा,गरिबी अन् अशिक्षिपणाचा फायदा घेत). अशावेळी जे कोणी बाहेरच्या देशातून आतंकवादी येतात  तेव्हा ते एकटे काही करू शकत नाही जो पर्यंत त्यांना आपल्या देशांतून कोणी मदत /सपोर्ट करत नाही..यांची मदत करणारी यंत्रणा शोधून वेळीच ठेचून काढली पाहिजे.. प्रत्येक गल्लीतील,गावातील, चाळीतील,इमारतीतील ना...

मी नवयुवक भारताचा🇮🇳

 स्वातंत्र्यासाठी दिनरात  लढले वीर जवान सारे  वीरांच्या बलिदानाने घुमती  लोकशाहीचे अखंड वारे....१            मी नवयुवक भारताचा           अखंडित  ऋण स्मरतो             देशाचा विकास करण्या           जागतिकीकरणाचा  मार्ग चालतो....२  देशप्रेम, संस्कार  शिदोरी  तरुणाईच्या मनात रुजते कला,क्रीडा क्षेत्राची भरारी  देशाच्या मुकुटावर सजते.....३            ज्ञानविज्ञान क्रांतीने  दाखवले             उत्कर्षाचे मार्ग अनेक             सर्वांगीण विकासाचे             शिलेदार आहोत हरेक..४    स्वाभिमानी देशभक्ती,     एकता भारताचे भूषण     अवकाशात घेतो भरारी     परिवर्तनाचे लेवून आभूषण....५  ✍️सौ जयश्री पंकज बोरसे कल्याण

*बलिदान*

समर्पिले हो आपुले प्राण त्यागिले ज्यांनी  स्वजीवन घेऊन स्वराज्याची  आण वाढविली  स्वतः ची शान .. स्वभूमिस  कित्येकजण पडले धरातीर्थी बहुजन देशासाठी सोडीले स्वप्राण करू या प्रणाम नमन ... अनादी अनंत महान कार्य मारता शत्रूस मरेन झुंझेन केले त्यांनी जीवन सार्थ देशभक्तासी शतश: नमन ... *© ®✍️ सौ.मीना घोडविंदे*