Skip to main content

Posts

पंढरपूर बस स्थानकात मोकाट गाई गुरे आणि खाजगी वाहनांचा सुळसुळाट

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. पंढरपूर बस स्थानकात सातत्याने मोकाट गाई गुरे वावरताना दिसतात आणि खाजगी वाहने अस्ताव्यस्त लावलेली दिसतात.या मुळे प्रवाशी वर्ग,बस चालक वाहक यांना विनाकारण त्रास होऊन वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.पंढरपूर तिर्थक्षेत्र असलेले ठिकाण असून येथे बारा महिने विठ्ठल भक्त, वारकरी येतात, साहजिकच या ठिकाणी सातत्याने गर्दी च गर्दी दिसून येते.या बस स्थानकात आणि आवारात मोकाट गाई गुरे आणि रिक्षा,चोर व्हिलर, अस्ताव्यस्त लावलेल्या आढळून येतात.काही रिक्षा वाले तर रिक्षा प्रवाशांना शेड च्या एकदम जवळ घेऊन जातात.मोकाट गाई गुरे येथे इकडून तिकडे फिरत असतात शोच, मल मूत्र सोडतात, सर्वत्र दुर्गंधी पसरते,डासाचा प्रादुर्भाव होऊन मलेरिया, डेंग्यू सारखे आजार पसरतात.अनेक प्रवाशी मलमुत्र शौच मध्ये घसरुन पडतात.एकंदरीत या समस्ये कडे राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देऊन मोकाट गाई गुरे कुत्री, आणि खाजगी वाहने यावर नियंत्रण ठेवावे.व प्रवाशी,बस चालक, यांना या समस्येतून मुक्तता करावी.

दर्जेदार कवितांनी संध्याकाळ बहरली.साहित्य सम्राट पुणे आणि करिअर सिद्धी हॉबी होम हडपसर यांच्या संयुक्त विद्यमानाने १९५ वे कवी संमेलन प्राध्यापिका आशादेवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून हास्य कवी बंडा जोशी उपस्थित होते

. साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी ग्रीन एरिया बी बिल्डिंग, शिंदे वस्ती हडपसर येथे आयोजित केले होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करियर सिद्धीच्या संचालिका माधुरी चिदरवार यांनी केले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन कुमारी श्रेया मराठी आणि मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.  एका पेक्षा एक अशा दर्जेदार मराठी हिंदी गझल कविता आणि गीतांनी सजलेली काव्य मैफिल रसिकांनी अनुभवली. या कवी संमेलनामध्ये  सौरभ मराठे, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, छगन वाघचौरे, राहुल जाधव, प्रल्हाद शिंदे, आशादेवी, दिपाली सहा, सविता गोकुळे, कल्याण इंदलकर, बंडा जोशी, पंडित मधुर, उद्धव महाजन, बाबासाहेब जाधव, राहुल भोसले, आनंद महाजन, गायत्री मराठी, श्रेया मराठी, माधुरी चिदरवार , संदीप चिदरवार इत्यादी कवी कवयित्री यांनी आपल्या दर्जेदार काव्यरचना सादर करून काव्य रसिकांची संध्याकाळ अविस्मरणीय केली.  रसिकांनी अशी कवी संमेलने पुन्हा पुन्हा घेण्याची मागणी केली.  कवी संमेलनाचे  नाविन्यपूर्ण सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर उत्कृष्ट आभार आनंद महाजन सरांनी व्यक्त ...

कवी बाळासाहेब तोरस्कर यांना साहित्य सेवा गौरव पुरस्कार जाहीर

  ठाणे/प्रतिनिधी : येथील  जेष्ठ कवी , लेखक समाजसेवक, पत्रकार प्रा.बाळासाहेब तोरस्कर यांना लेखन अन् मी साहित्य समुह परिवार कोल्हापूर यांचा या वर्षीचा साहित्य सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कार  सोहळ्याच्या अध्यक्षपदी ही त्यांची निवड करण्यात आली आहे .हा सोहळा वरद सभागृह गणेश मंदिर संस्थान , फडके रोड  डोंबिवली पूर्व येथे रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता लेखन अन् मी साहित्य समुहाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.‌ हा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक सतीश सोळांकुरकर , कवी विजय जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तोरस्कर हे साहित्यिक , सांस्कृतिक , सामाजिक, पत्रकारिता व फार्मास्युटिकल क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून ते अनेक साहित्यिक व सामाजिक संस्थाचे संस्थापक पदाधिकारी आहेत. ते साहित्य संपदा दिवाळी अंकाचे निवासी संपादक, कृषिराज दिवाळी अंकाचे सहसंपादक, जायंट गृप आॅफ कोल्हापूर मेट्रो चे माजी अध्यक्ष व कौन्सिल मेंबर, राष्ट्रीय श...

श्री दिनेश खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय सन्मान...

पुणे जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी श्री दिनेश ताराचंद खैरे यांना नेपाळ राज्यातील लुंबिनी शहरामध्ये आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय हिंदी कविता स्पर्धेच्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय मानद उपाधि सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    देवनागरी लिपीचे संरक्षण , नेपाळ भारत मैत्री मजबूत करणे, आणि नवोदित साहित्यिकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन नेपाळ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदी  कविता स्पर्धेमध्ये श्री दिनेश खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      श्री दिनेश खैरे हे नवोदित कवी साहित्यिक आहेत. त्यांनी शिक्षा आणि साहित्य, संस्कृती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे योगदान दिले आहे, त्यांनी वृत्तपत्रे, मासिके,  साप्ताहिके  दिवाळी अंक यासारख्या माध्यमातून साहित्य लेखन केले आहे. त्यांची दोन पुस्तके प...

*"कवितेच्या पारावर" प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा दुसरा शुभारंभी प्रयोग संपन्न*

ठाणे: महाराष्ट्राच्या विविध भागातील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून , कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचे देखणे प्रयोजन केले होते.         हरवलेल्या रसिकांना शोधण्यासाठी तसेच कवितेच्या हरवलेल्या गोत्राला एकसुरी धाग्यात गुंफून नव्या रसिकतेचा शोध घेत ही कवींची मांदियाळी "कवितेच्या पारावर" आपला नाविन्यपूर्ण ठाण मांडून बसली होती.‌ या देखण्या मैफिलीचा नवी मुंबईत हा दुसरा शुभारंभी प्रयोग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनाला मनापासून साद घालत ठाणे,कुर्ला, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा विविध भागांतून कवींनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती.           कविता आणि गाणी वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या ...

अभिप्राय. दिवाळी अंक - प्रवरेचे पाणी

आजही पूर्वीचे दिवाळीचे दिवस आठवतात...दिवाळीची स्वच्छता,फराळ बनविणे,कपडे,रांगोळी,दिवे,आकाश कंदील,माळा,फटाके खरेदी,घर रंगवणे,सजवणे इत्यादी कामे चालू असताना दिवाळी अंक वाचनाची खूप ओढ लागलेली असायची.वडील कधी दिवाळी अंक खरेदी करून आणतील आणि तो आपल्याला वाचायला मिळेल तो उत्साहच अदभुत होता.तोच उत्साह अजून ही आपल्या चेहऱ्यावर दिसतो,वागण्यातून जाणवतो,तीच धडपड,तोच अट्टाहास,अन् त्याच्या सोबत आता आपलेही लेखन सर्वांनी वाचावे यासाठीची उर्मी,त्यासाठी आपल्या मनातील विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे,त्याचे सर्वांनी कौतुक करणे,आपल्या कौतुकाने आई वडिलांच्या ,नातलगांच्या - मित्र मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद, आपल्याला प्रेरणा देतो,हेच दिवाळी अंकाचे प्रचंड यश.           "प्रवरेचे पाणी" दिवाळी अंक हाती पडला अन् त्यावरील मुखपृष्ठ पाहून मन हेलावून गेले.किती सुंदर,अचूक मुखपृष्ठ आहे...ज्यांनी आपले संपूर्ण जीवन नेहमी इतरांना मदत करण्यात घालविले,आपल्या भारताचे अनमोल रत्न रतनजी टाटा.सरस्वती सोबत लक्ष्मीची कायम कृपा दृष्टी त्यांच्यावर होती.पण,नित्य विनम्र भाव त्यांच्या सात्विक चे...

कवि सरकार इंगळी यांचे कडून निराधर आश्रामास रेशन साहित्य मदत .

हातकणंगले      कवि सरकार इंगळी व त्यांचे सहकारी यांनी निराधर आश्रमात रेशन साहित्य देऊन मदतीचा हातभार लावला आहे       आष्टा तालुका पलूस येथील अमर गंगथडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून चालवत असलेल्या निराधर आश्रमात वयवृद्ध पुरुष महिला 'दिव्यांत' मनोरुग्ण अशा व्यक्तीची समाजसेवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आहेत . कोणतेही शासनाचे अनुदान देणगी मिळत नसताना समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीने ते निरावर लोकांच्याकाठी आश्रम चालवत आहेत .       कवि सरकार इंगळी यांनी त्यांच्या आश्रमात जाऊन निरांधराना रेशन साहित्य मदत देणेचे कार्य केले आहे यासाठी अनिल दानोळे ( दिवाणजी ) भरत कणिरे ' हसन पटेल  माळवे व्यापारी 'प्रदिप कोळी प्रशांत भातमारे इंगळी विकास सोसायटी नंबर १ व २ स्वस्त धान्य दुकान . जिनेंद्र अकिवाटे यांचेही यांचेही  मोलाचे सहकार्य लाभले .