Skip to main content

Posts

*कवी शिवदास वाव्हळ यांच्या 'उध्वस्त भिंती' या काव्यसंग्रहाचे ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल मध्ये शानदार प्रकाशन*

ठाणे:- रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड विधानसभा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नीलपुष्प काव्यसंध्या या कार्यक्रमात कवी शिवदास वाव्हळ लिखित हा काव्यसंग्रह राजसा प्रकाशन उल्हासनगर यांनी प्रकाशित केला असून आज या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नीलपुष्प साहित्य समुहाचे आणि सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. राजेश साबळे, ओतूरकर, प्रमुख पाहुणे कवी मा. डॉ, मारुती नलावडे, आंतरराष्टरीय चित्रकार मा. सुरेश डुंबरे, वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे, गायिका संगीत विशारद मा. सौ सुमुग्धा माळी आणि उपस्थित कवी, लेख साहित्यिक अनेक शैक्षणिक, सामजिक संस्थेतील वाचक रसिक मंडळी तसेच कवी शिवदास वाव्हळ यांचा परिवार आणि पाहुणे, मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर प्रसंगी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन झाल्यावर कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ सुमुग्धा माळी यांनी सुंदर ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक सौ. मीनल चौधरी आणि पाहुण्याचा परिचय निवेदिका सौ. निलम शेलटे यांनी करुन देत असताना सर्व मान्यवरांचा यथोचित सन...

"मित्रांनीच केलं मित्राच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन "

“आम्ही संघवीकर”            संघवी केशरी कॉलेज            माजी विद्यार्थी (बॅच १९८७)    स्नेहमेळावा २५ जानेवारी २०२५. ..सरता सरता सरला ३७ वर्षांचा कालखंड तरी ह्या दोस्तांची मैत्री आजही आहे अखंड त्या मैत्रीला नाही कोणताच मापदंड एकजूटीचा दाखला देत पुन्हा जमले सारे देऊनी प्रतिसाद उदंड.श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ,श्री स्वामी समर्थ मंदिरा समोर,चिंचवडे गार्डन च्या निसर्ग रम्य आणि मनमोहक वातावरणात चिंचवडगाव येथे संघवी केशरी महाविद्यालयातील १९८७ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्स्फूर्तपणे साजरा झाला.शतकापार मिळालेला भरघोस प्रतिसाद आयोजकांनी घेतलेल्या पऱिश्रमाच्या यशाची पावती देणारा ठरला.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कॉलेज चे प्राचार्य कै.सुरवसे सर यांना आदरांजली वाहण्यात आली .क्षणभर सर्वजण सरांच्या आठवणीने भारावून गेले . या मेळाव्यात कार्यक्रमाची सुरवात चिंचवड गावातील युवा नेतृत्व भारत केसरी पैलवान विजय हनुमंत गावडे यांच्या व अमित पांढरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. दरवर्ष...

धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने " हळदी कुंकू आणि सांस्कृतिक " कार्यक्रमाचे आयोजन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कांदिवली पश्चिम येथील सह्याद्री नगर, गणेश मंदिर सभागृह या ठिकाणी धनगर समाजातील महिलां साठी " हळदी कुंकू व सांस्कृतिक" कार्यक्रम आयोजित केला आहे, असे मंडळाचे प्रवक्ते भारत कवितके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना कळविले आहे.समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा,संघटन वाढावे, महिलांना एकमेकांचा परिचय व्हावा, आणि यातूनच समाज कार्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन,दिप प्रज्वलन, विनम्र अभिवादन करून होईल, त्यानंतर महिलांचे हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील, अल्पोपहार व शेवटी कार्यक्रमाचा समारोप होईल.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश जी हाके,निहारिका खोंदले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घराण्यातील सुजाताताई होळकर, ऋतू गंधा आदी उपस्थित राहणार आहेत.कांदिवली विभागातील धनगर समाजातील जास्तीत जास्त महिलांनी या हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम ला उपस्थित र...

साहित्यरंग साहित्य मंच नाशिक द्वारा अंगुलिमाल उराडे सन्मानित

सुनील शिरपुरे/यवतमाळ  सोमवार दि.२७ जानेवारी २०२५ रोजी कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, मानस सेवा केंद्र, मायको हॉल सिडको नवे नाशिक येथे मोठ्या उत्साहात पुरस्कार सोहळा व कवी संमेलन पार पडले. या सोहळ्याचे आयोजन साहित्यरंग साहित्य मंच नाशिकच्या वतीने करण्यात आले होते.         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा.रविकांत शार्दुल, स्वागताध्यक्षपदी नाशिकचे ज्येष्ठ कवी मा.सुभाष उमरकर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखिका मा.सौ.इंदिरा जाधव जळगाव तर प्रमुख पाहुणे मा.हर्षवर्धन संजय सोनवणे, मा.सुहास टिपरे, युवा उपस्थिती मा.अश्विनी सांगळे, युवा कवी वक्ते व्याख्याते सुशीलकुमार देवराव शिंदे उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २१ व्यक्तींना समाज सेवा सन्मान, साहित्यरत्न, नारी रत्न असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील जांब (बुज) या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी कविवर्य अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार - २०२५ हा ...

*अजय चव्हाण यांच्या "अभंगसरीता" काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच चंद्रशेखर भुयार यांची गझल मैफील*

       युवा ज्योती सांस्कृतीक मंच दारव्हा तर्फे २८ जानेवारीला गझलकार चंद्रशेखर भुयार (बादशाह) यांची मराठी गझल मैफल तसेच तालुक्यातील, तरनोळी येथील युवा कवी अजय रमेश चव्हाण यांच्या "अभंगसरिता" ह्या अभंग संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम सुखकर्ता हॉल दारव्हा येथे संपन्न झाला. गझलकार चंद्रशेखर भुयार (बादशाह) यांचे हस्ते "अभंगसरिता" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनूदानातून हा अभंग संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. प्रारब्धात काय । कशाला बघावे । हसून जगावे । आयुष्याला ।। कशाला करावे । उद्याचे विचार । स्वप्नाला साकार । आज करा ।। प्रारब्धावर अवलंबून न राहता स्व प्रयत्नाने आपली स्वप्ने साकारली पाहिजे असा वास्तववाद सांगणारे अभंग अजय चव्हाण यांनी ह्या संग्रहात मांडले आहेत.  अभंगसरिता प्रकाशनानंतर गझलकार चंद्रशेखर भुयार (बादशाह) यांची गझल मैफल रंगली. बादशहा यांनी सादर केलेल्या बहारदार गझलांना रसीकश्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला.श्रोत्यांना खिळवून ठेवत शेतकऱ्यांची व्यथा तसेच सामाजिक,राजाकिय,तरुणाई,...

नाट्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात साजरा

मातृभाषा अध्यापक संस्था पुणे व रोटरी क्लब पुणे पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या महिन्यात नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .अनेक शाळांनी यात अगदी उत्स्फूर्त सहभाग दाखवला होता .  या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.ज्ञानप्रबोधिनी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.त्याचे सादरीकरण झाले. लहान गट ,मोठा गट , वाचिक अभिनय , वैयक्तिक ,शिक्षक नाट्य संहिता लेखन , सांघिक असे सन्मान करण्यात आले .  मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे.या संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्मिता ओव्हाळ यांनी प्रास्ताविक केले.संस्थेतील पदाधिकारी मा.संध्या माने,आ.सौ. वंदना आणेकर मा.श्री. निमल गीताभारती,मा.श्रीम. निफाडकर मंगल ,मा.श्री.पढेर विकास मा.सौ.शामला पंडित ( दीक्षित ) ,मा.श्रीम.सुरेखा लेंभे,मा.श्रीम.सोनवणे सुरेखा ,मा.श्री.जगताप सुजित, मा.श्री.गायके संभाजी, मा.श्री.पिंगळे संजय,मा. श्रीम.सुरळकर सुलभा , मा. सौ. शारदा पानगे यांचे कार्यक्रम सुनियोजित पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . प्रफुल्ल मुक्कामावर यांनी सिंगापूर या देशात ...

*कवयित्रीचे लेखन आणि ए.आय. तंत्रज्ञानाच्या मदतीने बाल साहित्य विश्वातील नवे प्रयोग म्हणजेच मलेका शेख यांचे "अक्षर अक्षर शिकूया" हे काव्यसंग्रह*

बाल काव्यसंग्रह लिहिणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे कारण मुलांना भावेल, त्यांना सहज म्हणता येईल, गुणगुणता येईल अशा सहज सोप्या शब्दात तसेच मुलांच्या भाव विश्वाला आणि कल्पनेला लक्षात घेऊन एक एक कविता साकारावी लागते. आपले तीन काव्यसंग्रह "मानसमेघ, अमन, आयाम" व एक चारोळीसंग्रह "उमेद" च्या प्रकाशनानंतर कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी "अक्षर अक्षर शिकूया" हे बाल काव्यसंग्रह लिहिला आहे. काव्यसंग्रह इतकं सुंदर आहे कि पाहताच वाचण्याचा मोह आवरला नाही.मनातील एक लहान बालक पुन्हा जागा झाला व मी माझ्या लहानपणात रमून गेलो असे वाटले कारण संपूर्ण काव्यसंग्रहात ए.आय. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक कवितेला साजेल असे चित्र प्रकाशकाने साकारले आहे. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट ज्योती घनश्याम यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून रेखाटले आहे. मुखपृष्टाला शाळेतील वर्गाचे चित्र रेखाटले आहे जो कि काव्यसंग्रहाला शोभून दिसतो. कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी आपला काव्यसंग्रह भावंडांना व मुलांना समर्पित केला आहे. या काव्यसंग्रहास लाडोबा प्रकाशनाचे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रस्त...