Skip to main content

Posts

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्थापित प्रभू श्रीराम मंदिर येथे फुटलेल्या पत्रातून पाण्याची गळती.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाली असल्याचे दिसून येते.पंढरपूर येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी येथील मंदिराच्या व्हरांड्यात पाणीच पाणी जमा झाले होते.आमचे मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके यांनी यावेळी मंदिरात दर्शनासाठी गेले असता व्हरांड्यात पाणीच पाणी आढळून आले.येथील पत्र्यांना ठिक ठिकाणी छिद्रे पाडली आहे, त्या मधून मंदिराच्या व्हरांड्यात पाणी पडत असते, येणाऱ्या आषाढी वारी पूर्वी व पावसाळा सुरू होण्यापूर्वी छिद्राची दुरुस्ती करावी.

मूळव्याध भगंदर होण्याचे लक्षणे !

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आजारांची सुरवात आपल्याला ओळखता आली पाहिजे . बरेचदा अस होत की आपल्याला आजाराची ओळख नसते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करून आजार तसाच वाढू देतो. ज्या मुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . सुरवातीला आपण आजार ओळखून त्याची चिकित्सा केली तर तो भविष्यामध्ये आपल्याला त्रास देणार नाही याची मात्र खात्री आहे .  सदर लेखात आपण बघणार आहो की कोण कोणते लक्षण आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या आजारानंमध्ये मुळात याचे भरपूर प्रकार आहेत. परंतु जास्त प्रमाणात आपल्याला तीन प्रकार जास्त बघायला मिळतात. एक म्हणजे फिशर यालाच संस्कृत भाषेत परिकर्तिका असे म्हणतात . यामध्ये मल (गुदमार्ग)मार्गावर चीर पडल्या जाते ज्या मुळे मलविसर्जन च्या वेळी जळजळ होणे ,रक्तस्त्राव होणे ,मल ला लागून रक्त येणे असे काही लक्षण दिसून येतात . याचे मुख्य कारण मलअवरोध व बध्दकोष्ठ  आहे . मल थांबून ठेवणे किंवा पोट साफ न होणे यामुळे हे वाढत जाते . दुसरा म्हणजे मूळव्याध ज्यामध्ये मल मार्गावर आपल्याला मासाची गाठी बाहेर आल्यासारखे वाटते . मल विसर्जन च्या वेळी स्पर्श जाणवतो .जास्त मोठे असल्यास रक्तस्त...

पंढरपूर बस स्थानकात बेवारसांचे साम्राज्य.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  पंढरपूर बस स्थानकात सध्या गर्दीच्या हंगामात रात्र दिवस बेवारसांचे साम्राज्य पसरले असल्याचे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांच्या निदर्शनास आले आहे.भिकारी, गर्दुल्ले, दारुडे आणि बेवारस लोकांनी बस स्थानकातील प्रवाशांना बसण्याच्या बाकावर ऐसपैस झोपलेले दिसतात, पाणी किंवा इतर पेय पिऊन तेथेच पिचकारी मारतात, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करणारे सुध्दा डोक्याखाली प्लास्टिक गुंडाळून झोपलेले असतात,बस स्थानकात उभे असलेल्या पुरुष महिला व बाल वृध्दांना बाकावर बसून देत नाहीत,या प्रकरणाकडे महामंडळाचे प्रशासन लक्ष देत नाही.सध्या उन्हाळ्याचे दिवस, शाळेचे सुट्टी चे दिवस, अनेक लहान मोठ्या यात्रा या मुळे पंढरपूर बस स्थानकात रात्र दिवस प्रवाशांची गर्दी असते.भिकारी पिण्याच्या पाण्याचा वापर अंग धुण्यासाठी करतात, प्रवाशी बसण्याच्या बाकावर आणि बाकाखाली कुत्री बसलेली झोपलेली आढळून येतात.तसेच या ठिकाणी साफसफाई करणारे महिला कामगाराचा मोठा ताफा दिसून येतो तरीही स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असतात.एकंदरीत येथील स्थानिक महामंडळ प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष क...

*ग्रामीण भागातून कु.अस्मिता काळे प्रथम*

जि. प. प्राथमीक शाळा आसेगाव. येथील विद्यार्थिनी, कु. अस्मिता रामप्रसाद काळे. या विद्यार्थिनींनी इयत्ता दहावी या परीक्षेत.95.20% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिचं भरभरून कौतुक होत आहे. तसेच या तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

*“विनायकनामा व कुसुम” पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला — माणुसकीचा सुगंध लाभलेला आगळा सोहळा!*

डोंबिवली(प्रतिनिधी) – लेखक रमेश मारुती पाटील यांच्या “विनायकनामा” आणि लेखक रफिक इनामदार यांच्या “कुसुम” या दोन भावस्पर्शी साहित्यकृतींचा संयुक्त प्रकाशन सोहळा अलीकडे अत्यंत आत्मीय आणि माणुसकीच्या ऊबेत पार पडला. या सोहळ्याने केवळ पुस्तकं प्रकाशित केली नाहीत, तर नात्यांचा एक नवा अध्याय लिहिला. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सौ. सोनाली महेश फडके व श्री. महेश फडके होते. त्यांच्या संयोजनात पार पडलेला हा सोहळा म्हणजे घरगुती प्रेमाचा आणि साहित्यिक सौंदर्याचा संगम ठरला. अध्यक्षस्थान भूषविलेले आदरणीय 'नमाई' सुभाष नाईक यांनी आपल्या समर्पक भाषणातून “विनायकनामा”च्या सामाजिक आणि भावनिक पैलूंना उलगडलं. प्रमुख अतिथी प्रा. नरेंद्र मोहन कदम यांनी “लेखन म्हणजे आत्मशोध” हे प्रतिपादन करत लेखकाच्या अंतरंगाचा वेध घेतला. विशेष अतिथी म्हणून श्री. उत्तमराव दासू तरकसे (क्राईम ब्रांच, नवी मुंबई) आणि मातृतीर्थ सिंदखेडराजाचे १४वे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव यांची उपस्थिती हा सोहळा अधिक समृद्ध करणारा ठरला. त्यांच्या विचारांनी आणि साधेपणाने सर्वांची मने जिंकली. कविसंमेलनातील कविंची हज...

*आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज*

==================== *१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.*          *कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.*                   *आज  सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढू...