Skip to main content

Posts

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...

*जातिनिहाय जनगणना परिषद : सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मुंबई कौन्सील) तर्फे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई येथे जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. परिषदेसाठी प्रमुख वक्ते सुरेश सावंत हे प्रसिद्ध राजकीय व सामाजिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे असणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणात त्यांचा योग्य वाटा मिळावा यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की हा डेटा विविध समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि संसाधनांचे प्रभावीपणे वाटप करण्यासाठी आवश्यक आहे. ही मागणी जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी ही परिषद मोठ्या जनआंदोलनाचा भाग आहे.  भारतीय...

बोरीवली मध्ये ३१ आगस्ट विमुक्त दिनाचे आयोजन.भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम

शनिवार दिनांक ३१ आगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बोरीवली येथील राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र,स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह, फुलपाखरू उद्यान, बोरीवली पूर्व या ठिकाणी विमूक्त घुमंतू जनजाती विकास परिषद ( अ.भा.)यांचे वतीने विमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.३१ आगस्ट विमुक्त दिन साजरा करण्यात येणार आहे या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ.निहारिका खोंदले सचीव भाजपा मुंबई,व अध्यक्षा धनगर समाज एकता मंडळ, बबनराव मोहिते उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र, प्रमुख उपस्थिती भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम साहित्यिक व पत्रकार,लहू पवार सदस्य, मी वडार महाराष्ट्राचा,सौ.अर्चना लष्कर महिला अध्यक्षा मी वडार महाराष्ट्राचा, आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या विमुक्त दिनाचे निमंत्रक सहदेव रसाळ अध्यक्ष मुंबई गिरीधर साळुंखे कार्यवाह मुंबई, महादेव रसाळ, मंगेश शिंगे,धृपद रवंदळे,उमेश जोशी, अशोक वाडेकर,मोहन अलकुंटे, संदेश रसाळ, गंगाराम क्षिरसागर,सुजीत गोसावी आदी विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद चे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार - २०२४ सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

 प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मुंबई वांद्रा पश्चिम येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता  विविध क्षेत्रतील मानवरांना  प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले ' उद्घाटक  साहित्यिक आणि उपाध्यक्ष सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य  डॉ. खं . रं . माळवे खरमा . मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आले . बी. पी . ई . हायस्कूल बान्द्रा या मुलींनी स्वागत गीत सादर केले .  स्वागताध्यक्ष आणि  कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे मुंबई यांनी आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिका वाचन केले आणि  त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले .  आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ डी .जी  यादव डॉ डेरिक एंजल्स ' डॉ सुकृत खांडेकर ' श्री भानुदास केसरे ' प्रमोद महाडीक ' रामकृष्ण कोळवणकर ' राजीव कांबळे , डॉ गॅन्सी अल्बुकर्क आदि मान्यवर उपस्थितीत ...

*स्व परिचय*

 *1)पूर्ण नाव:*  *श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे*   *2) सध्या राहत असलेला पत्ता:-* *मोरेश्वर कॉम्प्लेक्स, D-403, सेक्टर-* *18, कामोठे, नवी मुंबई ,*   *तालुका: पनवेल,*   *जिल्हा:रायगड.*  *3) मूळ गाव.*      *मुक्काम पोस्ट:  पाडळी दर्या,*       *तालुका: पारनेर*       *जिल्हा: अहमदनगर*  *4)शिक्षण*: *DSM,BABED.*   *5)वय : 56*  *6)पद*: *सहाय्यक शिक्षक*  *7) शाळा ,नाव, पत्ता*:        *मोहिते पाटील विद्यालय,*          *वीर तानाजी भोसले मार्ग*          *पनवेल घाटकोपर लिंक रोड,*           *मोहिते पाटील नगर,*            *मानखुर्द, मुंबई- ४०००४३*  *8) नोकरी करत असाल तर,एकूण नोकरी.*: *२६*  *9) शासनाकडून / किंवा इतर फाउंडेशनकडून मिळालेले पुरस्कार नावे..*  *इतर फाऊंडेशन/ सामाजिक संस्थे* *कडून मिळालेले पुरस्कार* *संख्या - २१...

*नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन* *विशेष लेख*

*लेखिका* *अनुपमा जाधव* *उपक्रमशील, आदर्श शिक्षिका,* *शाळा..के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू*    श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो.भाऊ बहिणीच्या या पवित्र प्रेमाला राखी पौर्णिमेच्या दिवशी जणू उधाणचं येते.या दिवशी बहिण सुंदर पाट मांडते.पाटाभोवती विविध कलाकुसरतेने रांगोळी काढते.व भावाला ओवाळण्यासाठी ताटाची आकर्षक सजावट करते.भावाच्या कपाळावर कुंकू, अक्षदा लावते.व त्याला ओवाळते, राखी बांधते.मिठाई भरवते. भावाचे तोंड गोड करते.मग भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या ताटात पैसे, भेट वस्तू देतो.त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन खूष ठेवतो.            आपल्या भावाची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्याने बहिणीचे रक्षण करावे.ही त्यामागची भावना असते.आपला भाऊ सुखी, समाधानी, आनंदी असावा.त्याने आपल्या आई वडिलांचा ,परीवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक बहिणीला वाटत असते. तसेच आपल्या बहिणीला ही कोणत्याही प्रकारची उणिव भासू नये यासाठी भाऊ तिला एखाद्या फुलाप्रमाणे जपत असतो.एवढं राखीच्या धाग्याचं महत्त्व आहे. ...

पार(स्वा)तंत्र्य

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या  पूर्व संधेला घडली एक अघटित घटना  कोलकात्यातील एका डॉक्टर भगिनीचा  करुनी विनयभंग खून केला काही  नराधमानी  आज मी विचारतो एक प्रश्न तुम्हा सर्वांना  आहोत का तुम्ही -आम्ही खरोखरच स्वतंत्र ?  सडलेली आमची डोकी शोधत असतात  पीडितेची जात आणि आरोपीचा धर्म  आहे आमचा प्रधान आंधळा गृहमंत्र्याचे आहेत कान बहिरे  न्याय कसा मागावा न्याय देवतेला  आहे इथली व्यवस्था भ्रष्ट आणि लाचार  बुरसटलेल्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या  आहेत साक्षीदार घटना हजार  आहे स्वतंत्र फसवे  या देशाचे, भगिनी आहेत असुरक्षित आणि युवा बेरोजगार  झाले आहे माझे मन बधिर आणि सुन्न  नाही साजरा करणार मी आता स्वातंत्र्य दिन  देश अजूनही आहे पारतंत्र्यात  उगवेल ती ही सोनेरी पहाट  होऊनी सुजाण नागरिक  घेऊ आपण सर्वजण मोकळा श्वास  कवी भूषण सुकेशनी वामनराव