Skip to main content

Posts

*पुजा माळी यांचा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सहभाग*

बारामती येथील जेष्ठ कवयित्री लेखीका पुजा माळी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक डे केअर सेंटर शाळा व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केलेल्या रुपेरी काव्यहोत्र या सलग २५ तास स्वयंरचीत काव्य वाचनाचा वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहभाग झाल्याबद्दल रुपेरु काव्यहोत्र आयोजक समितिच्या प्रमुख अॅड डॉ सौ अंजली पाटील, सहसचिव श्री गोपाळ पाटील,अॅड श्री ल जि उगावकर, अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला  तसेच डे केअर सेंटर शाळा आयोजित असलेल्या बालकाव्य स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील स्मरनिकेसाठी पुजा माळी यांच्या *बागेत कवितेच्या* या बालकवितेची निवड झाली आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळा मधील साधुबाबा क्रोधीत होऊन मारहाण करतात.. पत्रकार भारत कवितके यांची खंत.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. प्रयागराज येथील कुंभमेळा मधील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलं साधुबाबा क्रोधित होऊन शिव्या देतात, मारहाण करतात,अशी खंत पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी व्यक्त केली आहे.नागबाबा, अघोरी बाबा, लांब केस वाला बाबा, लांब दाढी वाढलेला बाबा, डमरू वाजविणारा साधु वैगरे वैगरे साधुबाबा पाहयला मिळतात,पण यांना सामान्य माणसाने किंवा पत्रकाराने काही प्रश्न विचारले तर लगेच क्रोधित होऊन शिव्या देतात, मारहाण करतात.खर तर साधुबाबा म्हणजे शांत,सरळ, तपाला, ध्यानस्थ बसलेले साधुबाबा असतात असा समज असतो,पण कुंभमेळा मधील साधुबाबा लवकरच क्रोधित होऊन शिव्या देत मारहाण करताना आपण सर्व जण प्रसार माध्यमांतून पाहतो,हे असे वागणे साधुबाबांना शोभत नाही,हे पाहताना खूपच वाईट वाटते,आपले आपले वेगळेपण दाखविण्यासाठी कुंभमेळा मधील साधुबाबा वेगवेगळ किळसवाणी प्रयोग करताना दिसतात.कुंभ मेळा तील साधुबाबांचे हे वागणे प्रसार माध्यमा व्दारा पाहताना खूप वाईट वाटते, मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

पुणे:- सौ.प्रतिमा काळे मॅडम यांचा गदिमांचे वारसदार कवी म्हणून सन्मान.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद,आशिया मानवशक्ती विकास संस्था,गणेश इंटरनॅशनल स्कूल,चिखली आयोजित ३२ वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव मध्ये मंगळवार, दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी मा.आनंद माडगूळकर( गदिमांचे सुपुत्र,संगीतकार),महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,कल्याण आयुक्त मा.रविराज इळवे सर,८९ व्या अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस सर,ज्येष्ठ कविवर्य,मुंबई मा.अशोक नायगावकर सर,नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी चे अध्यक्ष मा. सुदाम भोरे सर,आशिया मानवशक्ती विकास संस्था चे अध्यक्ष मा.श्रमश्री बाजीराव सातपुते सर,कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य मा.डॉ.विठ्ठल वाघ सर,गणेश इंटरनॅशनल स्कूल,चिखली चे संस्थापक मा.एस.बी.पाटील सर व या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणारे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद,पुणे चे अध्यक्ष सर्वांचे लाडके मामा मा.पुरुषोत्तम सदाफुले सर,कार्याध्यक्ष राजेंद्र वाघ सर,उपाध्यक्ष अरुण गराडे सर,मुख्य समन्वयक मा.महेंद्र भारती सर,जयश्री ताई श्रीखंडे,भरत दौंडकर सर,मुरलीधर साठे सर या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्...

मी बोललचं पाहिजे

हा हा मी मी बोललचं पाहिजे आज नाही तर कधीच मी बोलू शकणार नाही हे मलाही अन् तुम्हालाही चांगलेच माहिती आहे माझा आत्मा गेल्यावर फक्त बॉडी राहील शिल्लक ती काय बोलणार,काय विचार करणार?ती फक्त सरणावर जळणार किंवा या मातीत,कबरेत बंदिस्त होणार म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे.. आज नाही तर कधीच नाही... मला जन्म देण्यासाठीही तू एक स्री असूनही किती विचार करते? देवू का नको या स्री गर्भाला जन्म म्हणून आतून काय आणि कसे सांगू ग आतून किती  मी तुटते किती मी ढासळते,कोसळते,अन् पुन्हा स्वतः स सावरते माझाच जन्म एका स्त्रीला सुद्धा नकोसा झाला? कोठे मागणार मी दाद सांगा तुम्हीच मला म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे.. आज नाही तर कधीच नाही... धन्य मायबाप ,अखेर दिला ओ तुम्ही मला जन्म पण,रात्रंदिन तुम्हाला माझ्या विचारापायी झोपही तुम्हा लागेना.. मी लहान मूल असो,तरुण असो की म्हातारी तरी दृष्ट नजरा माझी शिकार करायला टपलेल्या दिसतात.. त्यांची शिकार तर मी होणार नाही ना या विवंचनेत तुमची झोपही उडते समजते मला तुमची आतुरता,तळमळ .. पण,तो पुरुष ही एक मायचा तुकडाच असतो तरी असे अघोरी कृत्य कसा करतो?.... त्याची माय,बहिण,...

सहकार भारतीचा स्थापनादिन कल्याण मध्ये साजरा

 (अतुल फडके  - कल्याण) रविवारी १२ जानेवारी रोजी सहकार भारतीचा स्थापना दिन कल्याणच्या अभिनव शाळेत साजरा करण्यात आला ़सहकार भारती ही राष्ट्रीय संस्था असून भारतीय सहकार क्षेत्रात (१९७८)स्थापनेपासून कार्यरत आहे ़संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांनी या संस्थेची स्थापना केली ़११ जानेवारी १९७९ रोजी ही संस्था नोंदणीकृत झाली ़सहकारी सहकारी क्षेत्रांना प्रोत्साहन देणे, त्यांची कार्यक्षमता वाढवणे, सहकारी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे ,ग्रामीण व शहरी भागातही या चळवळीचा विस्तार करणे ,व सहकारी संस्थांचे संघटन करणे, हे सहकार भारतीचे मुख्य उद्देश आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून या सहकार भारती संस्थेची स्थापना झाली असून "मूल्यांशिवाय सहकार्य नाही सहकार्याशिवाय मोक्ष नाही" असे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे़़ अशी संस्थेबद्दल माहिती एडवोकेट उज्वला पाटील यांनी दिली टेन्शनतरी सहकार भारतीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने १०मान्यवरांना "सहकार भूषण "पुरस्काराने गौरविण्यातत आले ़कल्याण जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनं...

'अशी भरली ग्रामसभा' नाटिकेची जिल्हास्तरावर निवड

श्रीरामपूर (प्रतिनिधी )--  जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित श्रीरामपूर पंचायत समिती तालुकास्तर सांस्कृतिक स्पर्धा अशोकनगर येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या.बालगटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडीच्या विद्यार्थ्यांची 'अशी भरली ग्रामसभा' ही विनोदी आणि प्रबोधनपर ठरणारी नाटिका तालुक्यात पहिली आली.या नाटिकेचे संवादलेखन आणि दिग्दर्शन उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले आहे. ही नाटिका जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख  आंबीलवादे, केंद्रसमन्वयक राजेंद्र केदारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक आणि शालेय व्यवस्थापन समिती माळेवाडी, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे आदींनी अभिनंदन केले. ग्रामसुधारक उपक्रमांना आवश्यक आदर्श ग्रामसभेचे सादरीकरण बालकलाकार सोहम वमने,आर्यन बनसोडे, साई उमाप,यश वमने, अमन शहा ,सत्यजित उमाप, श्रीजीत लबडे, कृष्णा खिलारी, ओमकार ताके,गणेश पवार,...

*आभार...*

आभार मानणे' तशी एकदम सोपी गोष्ट पण आपण आभार मानण्यात खुपदा स्वतःचा कमीपणा मानतो आणी जिथे आभार मानायचे तिथेही आभार मानत नाही.. माझ्या मते आपण प्रत्येक क्षणी समोरच्याचे मनापासून आभार मानायची सवय लावून घेतली पाहीजे.. येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयूष्यात काहीतरी नवीन घेऊन येत असतो.. आपल्याला काहीतरी देऊनच जात असतो, काहीही झाल तरी आभार मानत चला.. चांगल्या गोष्टीत तर मानायला हवेतच, पण अगदी वाईट गोष्ट घडली तरीही आभार मानायला विसरु नका.रस्त्यावरुन जाताना ठेच लागली तर त्या दगडाचे मनापासून आभार माना, कारण तो तुम्हाला नीट लक्षपूर्वक चालायला शिकवतोय. एखाद्या जवळच्या व्यक्तीने धोका दिला, फसवल तर त्याचेही आभार माना, तो तुम्हाला माणसं कशी ओळखायची हे शिकवते. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी चांगल कारण असतच.एखाद्याच्या  नजरेत जरी आपली किंमत शुन्य असली तरी कुणासाठी आपण अनमोल सुध्दा असु शकतो..आपली किंमत आधी आपण स्वतः ओळखण खुप महत्वाच असत.. आणी मग इतरांच्या नजरेत ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावं. अर्थात आपल्या मधील चांगल्या गुणांचा विकास करुनच केवळ हे शक्य आहे, हो ना....! हिरकणी सौ.अनिता ...