Skip to main content

Posts

*ग्रामीण भागातून कु.अस्मिता काळे प्रथम*

जि. प. प्राथमीक शाळा आसेगाव. येथील विद्यार्थिनी, कु. अस्मिता रामप्रसाद काळे. या विद्यार्थिनींनी इयत्ता दहावी या परीक्षेत.95.20% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिचं भरभरून कौतुक होत आहे. तसेच या तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

*“विनायकनामा व कुसुम” पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला — माणुसकीचा सुगंध लाभलेला आगळा सोहळा!*

डोंबिवली(प्रतिनिधी) – लेखक रमेश मारुती पाटील यांच्या “विनायकनामा” आणि लेखक रफिक इनामदार यांच्या “कुसुम” या दोन भावस्पर्शी साहित्यकृतींचा संयुक्त प्रकाशन सोहळा अलीकडे अत्यंत आत्मीय आणि माणुसकीच्या ऊबेत पार पडला. या सोहळ्याने केवळ पुस्तकं प्रकाशित केली नाहीत, तर नात्यांचा एक नवा अध्याय लिहिला. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सौ. सोनाली महेश फडके व श्री. महेश फडके होते. त्यांच्या संयोजनात पार पडलेला हा सोहळा म्हणजे घरगुती प्रेमाचा आणि साहित्यिक सौंदर्याचा संगम ठरला. अध्यक्षस्थान भूषविलेले आदरणीय 'नमाई' सुभाष नाईक यांनी आपल्या समर्पक भाषणातून “विनायकनामा”च्या सामाजिक आणि भावनिक पैलूंना उलगडलं. प्रमुख अतिथी प्रा. नरेंद्र मोहन कदम यांनी “लेखन म्हणजे आत्मशोध” हे प्रतिपादन करत लेखकाच्या अंतरंगाचा वेध घेतला. विशेष अतिथी म्हणून श्री. उत्तमराव दासू तरकसे (क्राईम ब्रांच, नवी मुंबई) आणि मातृतीर्थ सिंदखेडराजाचे १४वे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव यांची उपस्थिती हा सोहळा अधिक समृद्ध करणारा ठरला. त्यांच्या विचारांनी आणि साधेपणाने सर्वांची मने जिंकली. कविसंमेलनातील कविंची हज...

*आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज*

==================== *१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.*          *कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.*                   *आज  सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढू...

वारसा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्यिक रज्जाक शेख

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- वारसा साहित्य मंच मराठवाडा आयोजित 25 मे ला होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी साहित्यीक रज्जाक शेख श्रीरामपूरकर यांची  बहुमताने निवड करण्यात आली.स्वागताध्यक्षपदाचे निवडपत्र उद्घाटक साहित्यिक भारत सातपुते(लातूर),वैभव धर्माधिकारी(पुणे),अर्जुन गायकवाड( बीड),नवनाथ शिंदे(अहील्यानगर),पवन शेळके, ज्ञानदेव दिघुळे आणि इतर सर्व कोअर कमिटी यांच्या हस्ते हॉटेल शांतीकमल शिर्डी येथे देण्यात आले. राज्यस्तरीय कविसंमेलनात नामांकित कविकवयित्री यांची हजेरी लागणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील  ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख  यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या दीड हजारापेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.  मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टाक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आखिल भारतीय मराठी...

*चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

दिनांक २७ एप्रिल रोजी हॉटेल ईशा येथे चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संस्थापक पं. सुरेश साखवळकर  होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सौ . विजया शुक्ला यांनी  मधुर आवाजात ईशस्तवन म्हटले. चंद्रकिरणच्या अध्यक्षा सौ. संगीता पवार यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार श्री. सतीश साठे यांनी पं. सुरेश साखवळकर यांचा परिचय करून दिला, तर गझलकारा नंदिनी काळे यांनी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांची ओळख करून दिली. सौ. संगीता पवार यांनी कार्यक्रमाचे  अध्यक्ष पं. सुरेश  साखावळकर आणि प्रमुख पाहुण्या डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. चंद्रकिरणच्या कवी व गझलकारा अर्चना मुरुगकर, नंदिनी काळे आणि श्रीराम घडे यांच्या काव्यार्चना, काहूर अंतरीचे व रूमणं या काव्य व गझलसंग्रह ...

महापुरुषांच्या विचाराची काव्यात्मक अक्षर पेरणी बहरली

पुणे: प्रतिनिधी        महापुरुषांच्या  विचाराचा वारसा  व विचार समाजामध्ये रुजावीत व   ते विचार अंगीकृत करावे यासाठी साहित्यिक कविता द्वारे विचारातून  समाज परीवर्तन करत आहेत.   असे मत ॲड.शरद दरेकर यांनी प्रस्ताविकेत मांडले. साहित्य सम्राटचे २०४ वे कवीसंमेलन व वारसा विचारांचा ग्रुप शिक्रापूर  यांचे संयुक्त विद्यमानाने सोनल कॅफे 1906 पाबळ रोड शिक्रापूर येथे आयोजित केले होते. कवी संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते  छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलाने करण्यात आली. वारसा महापुरुषांच्या विचारांचा या विषयासह वास्तववादी आणि मनाला भावणाऱ्या कविता व गझल मान्यवर कवींनी सादर करून उपस्थित काव्य रसिकांची मने जिंकली.    शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे  आदरणीय विनोद अष्टुळ यांची प्रबोधनात्मक भाष्य करणारी स्वराज्य ही सुप्रसिद्ध गेय कविता, युवा कवी सागर जाधव यांचे प्रेमगीत, रफिक इनामदार यांची तुपातली पोळी, सूर्यकांत नामूगडे यांची वय झालं म्हणून काय झालं, तसेच...

*कवितेच्या पारावर प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात संपन्न*

            महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून, कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात पार पडला.             हरवलेल्या रसिकांचा शोध घेत मनाला मनापासून साद घालत ठाणे, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व ताराराणी भोसले यांच्या खंबीर लढ्याचा ठाव घेत गीतं आणि कविता वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या गेल्या. पारावर जमलेल्या प्रत्येक कवीने स्वर व शब्दांच्या साथीने आपल्या कवितेत प्राण ओतला व रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजभान, वास्तवभान त्याबरोबरच बोलगाणी, गी...