Skip to main content

Posts

समाज परिवर्तन करण्यासाठी ज्या सदैव आपल्या विचारातून कर्मातून प्रयत्न करत असतात अशा मार्गदर्शिका , लेखिका आम्रपाली धेंडे मॅडम यांचे नाटक कलांतर ......एक हृदयस्पर्शी कथा ...दिग्दर्शक चिन्मय मायदेव

दिनांक : 9/11/20224 रोजी डोंबिवली पूर्व या ठिकाणी कलांतर.... एक हृदयस्पर्शी कथा हे नाटक संपन्न करण्यात आले लेखिका आम्रपाली धेंडे यांनी या नाटकातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे हे नाटक प्रत्येकाने पाहून कुटुंबा चा  दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न केला आहे . कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे असे मत लेखिका आम्रपाली धेंडे यांनी व्यक्त केले आहे. मुलांना समजून घेऊन त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना प्रेम दिले पाहिजे . या नाटकाचे सुंदर असे दिग्दर्शन चिन्मय मायदेव सरांनी केले आहे . चिन्मय सर यांच्यात ही एक छान कला आहे सर्वांना एकत्रित घेऊन छान असे दिग्दर्शन करतात त्यामुळे अभिनय हा छान प्रकारे पार पडला जातो तसेच तसेच या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे  रश्मी वर्मा  ( प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड मॉडेल )  मनाने पाटील .. समाजसेविका   प्राजक्ता बर्वे   :: नृत्य विशारद   स्मिता माटेकर .. Model या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून समजा मध्ये छान परिवर्तन घडून येईल आणि हे नाटक प्रत्येकाने पहावे...

शब्द माझे तुझ्याचसाठी " आणि "मयूरस्पर्श " प्रकाशित

        उत्तोमत्तम कथा कवितासंग्रह निर्माण करणाऱ्या  साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे  कवयित्री अश्विनी सचिन बोलके यांचा 'शब्द माझे तुझ्याचसाठी' हा काव्यसंग्रह तसेच कवी मयूर महादेव पालकर यांचा 'मयूरस्पर्श' हा चारोळीसंग्रह नवीन पनवेल येथील अभियंता भवन, आकुर्ली येथे प्रकाशित झाला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक - सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष - ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री,शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असं असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आणि इतर मान्यवर  उपस्थित होते.  सदर मान्यवरांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते 'शब्द माझे तुझ्याचसाठी' आणि 'मयूरस्पर्श' या पुस्तकांचे अनावरण केले गेले. कवयित्री अश्विनी बोलके आणि मयूर पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बुगटे आलूर ग्रामस्थ संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सक्रिय कार्यकर्ते संजय पालकर यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्य...

गैरसमज

            राहुल आणि मी एकाच कॉलेज मध्ये शिकत होते. कॉलेजचा पहिला दिवस होता सगळे अनोळखी होते म्हणून कुणीकुणाशी बोलले नाही.        आठ दिवस असेच निघून गेले हळू हळू ओळख झाली मुलं मुली बोलायला लागलो मैत्री झाली.          एक दिवस अचानक नवीन मुलगा वर्गात आला आणि आजच ऍडमिशन घेतलं असं सांगितलं सगळ्यांची ओळख करून घेतली खूप हुशार शांत लाघवी होता राहुल आमची मैत्री लगेच झाली.        फस्ट सेम झाली आणि आणि आम्हाला सुट्टया लागल्या सगळे घरी गेले. राहुल शिवाय करमत नव्हतं कधी सुट्टी संपते असं झालं होत. मी राहुल ला कॉल केला तो म्हणाला हा "रूपा "बोल कसा फोन केला. मी म्हणाले सहज केला सुट्टया संपतील सेकण्ड सेम सुरु होईल अभ्यास वाढेल तेंव्हा जरा अभ्यासाचं नियोजन करावं,,,,,,,, राहुल म्हणाला हेच कारण आहे ना कि दुसरं काही कारण आहे असेल तर सांग,,,,,,, मी शांत झाले राहुल हसून म्हणाला करमत नाही का माझ्याशिवाय बोलावं वाटतं कि भेटावं वाटतं येऊ का भेटायला कि प्रेमात पडली आहेस,,,,,,, माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी हस...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*परिसंवाद - पाली भाषा व मराठी भाषा*

      मंगळवार दि.५ नोव्हेंबर २०२४ धम्मदीप सभागृह शहापूर जि.ठाणे येथील धम्मदीप कल्चरल संस्थेच्या सभागृहात पाली भाषा व मराठी भाषे संदर्भात परिसंवाद पार पडला.निमित्त होतं दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पाली भाषा,मराठी भाषा व इतर सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. यावेळी पालेभाषे संदर्भात उद्बोधन करण्यासाठी पालेभाषेचे सन्माननीय प्रा.डॉ.सुरेश मानाजी सोनोने सर (पाली भाषा विभाग प्रमुख राजर्षी शाहू महाविद्यालय- लातूर) त्याच प्रमाणे मराठी भाषेवर उद्भोधन करण्यासाठी मराठी भाषेचे सन्माननीय प्रा.संजय निचिते सर (गोल्ड मेडलिस्ट एम ए इन मराठी - मुंबई विद्यापीठ) हे उपस्थित होते. सोबत धम्मदीप संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश पवार सर,भिमाई पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर उबाळे सर, मैत्री संघाचे अध्यक्ष व नाटककार सन्माननीय बाळासाहेब थोरात सर ( माजी कस्टम ऑफिसर) तसेच सोनोने सरांच्या सहचरणी डॉ. वैशाली सोनोने (पाली- पी.एच.डी.) सरांची मुलगी स्नेहा सोनोने (पाली पी.एच.डी.) व सरांचा मुलगा दिग्विजय सोनोने (पाली पी.एच.डी.) तसेच सरांची दुसरी मुलगी डॉ.द...

व-हाडी कवी प्रशांत दामले यांची रुपेरी पडद्यावर झेपहास्य कलागुणांमुळे त्यांची चित्रपटात निवड

सुनील शिरपुरे/यवतमाळ अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद या खेडेगावात वास्तव्यास असलेले व-हाडी हास्य कवी प्रशांत दामले यांची " शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख" या मराठी चित्रपटात निवड करण्यात आली आहे. संस्कृतीचा वारसा समोर नेत शालेय जीवनातील विद्यार्थी तणावमुक्त असावा यासाठी वऱ्हाडी कवितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रामध्ये चांगलीच ओळख निर्माण केलेली आहे. सामान्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी "कला फाउंडेशन" नावाची संस्था सुरू करून कवी, लेखक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. इतकेच नव्हे तर दुर्गम भागात राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना कला फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून बुक, पेन, वही वाटप असा उपक्रम राबवून समाजकार्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी त्यांनी आपली कला अविरतपणे सुरू ठेवून विविध पुरस्कार सुद्धा मिळवले. अशातच त्यांच्या हास्यात्मक कलेची दखल "शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख" या चित्रपटासाठी घेतल्याने प्रशांत दामले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.!

स्वारगेट (पुणे) बस स्थानकातील गैरसोयी मुळे प्रवाशी त्रस्त तर महाराष्ट्र परिवहन महामंडळ मात्र मस्त.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. महाराष्ट्र राज्यात मध्यवर्ती समजले जाणारे बस स्थानक स्वारगेट (पुणे) बस स्थानक परिसरात गैरसोयी मुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झालेला असून तेथील महामंडळ प्रशासन मात्र मस्त असल्याचे दिसून येते,या बस स्थानकात मोटार सायकल,चार चाकी वाहने, रिक्षा,बस स्थानक च्या डाव्या व उजव्या बाजूला अस्ताव्यस्त लावलेल्या आढळून येतात, साहजिकच बाहेरुन येणाऱ्या बसेसची कोंडी होते,बस स्थानक च्या प्रवेशद्वारा जवळ आत पर्यंत रिक्षाच्या रांगा लागलेल्या असतात.येथून आत येणाऱ्या बसेसना अडथळा निर्माण होतो व स्थानका बाहेर बसची रांग लागली जाते व वाहतूक कोंडी होते.प्रवाशांना पायी चालत बस स्थानकात प्रवेश करताना अडचण निर्माण होते.बस स्थानका बाहेर पार्किंग ची सोय नसल्याने प्रवाशांना सोडायला आलेल्या चार चाकी वाहनाची गर्दी येथे दिसून येते, साहजिक बस स्थानकात वाहतूक कोंडी निर्माण होते.बस स्थानकातील वेड्या वाकड्या जागेमुळे मुक्कामाला बाहेरुन आलेल्या बस अस्ताव्यस्त लावलेल्या असतात.शेड क्रमांक २५ ते २८ नवीन सुरु करण्यात आले असून रात्री तिथे मुक्कामी आलेल्या बसेस अस्ताव्यस्त लावल्या असल्याने श...