Skip to main content

Posts

वारसा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्यिक रज्जाक शेख

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- वारसा साहित्य मंच मराठवाडा आयोजित 25 मे ला होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी साहित्यीक रज्जाक शेख श्रीरामपूरकर यांची  बहुमताने निवड करण्यात आली.स्वागताध्यक्षपदाचे निवडपत्र उद्घाटक साहित्यिक भारत सातपुते(लातूर),वैभव धर्माधिकारी(पुणे),अर्जुन गायकवाड( बीड),नवनाथ शिंदे(अहील्यानगर),पवन शेळके, ज्ञानदेव दिघुळे आणि इतर सर्व कोअर कमिटी यांच्या हस्ते हॉटेल शांतीकमल शिर्डी येथे देण्यात आले. राज्यस्तरीय कविसंमेलनात नामांकित कविकवयित्री यांची हजेरी लागणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील  ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख  यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या दीड हजारापेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.  मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टाक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आखिल भारतीय मराठी...

*चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

दिनांक २७ एप्रिल रोजी हॉटेल ईशा येथे चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संस्थापक पं. सुरेश साखवळकर  होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सौ . विजया शुक्ला यांनी  मधुर आवाजात ईशस्तवन म्हटले. चंद्रकिरणच्या अध्यक्षा सौ. संगीता पवार यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार श्री. सतीश साठे यांनी पं. सुरेश साखवळकर यांचा परिचय करून दिला, तर गझलकारा नंदिनी काळे यांनी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांची ओळख करून दिली. सौ. संगीता पवार यांनी कार्यक्रमाचे  अध्यक्ष पं. सुरेश  साखावळकर आणि प्रमुख पाहुण्या डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. चंद्रकिरणच्या कवी व गझलकारा अर्चना मुरुगकर, नंदिनी काळे आणि श्रीराम घडे यांच्या काव्यार्चना, काहूर अंतरीचे व रूमणं या काव्य व गझलसंग्रह ...

महापुरुषांच्या विचाराची काव्यात्मक अक्षर पेरणी बहरली

पुणे: प्रतिनिधी        महापुरुषांच्या  विचाराचा वारसा  व विचार समाजामध्ये रुजावीत व   ते विचार अंगीकृत करावे यासाठी साहित्यिक कविता द्वारे विचारातून  समाज परीवर्तन करत आहेत.   असे मत ॲड.शरद दरेकर यांनी प्रस्ताविकेत मांडले. साहित्य सम्राटचे २०४ वे कवीसंमेलन व वारसा विचारांचा ग्रुप शिक्रापूर  यांचे संयुक्त विद्यमानाने सोनल कॅफे 1906 पाबळ रोड शिक्रापूर येथे आयोजित केले होते. कवी संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते  छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलाने करण्यात आली. वारसा महापुरुषांच्या विचारांचा या विषयासह वास्तववादी आणि मनाला भावणाऱ्या कविता व गझल मान्यवर कवींनी सादर करून उपस्थित काव्य रसिकांची मने जिंकली.    शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे  आदरणीय विनोद अष्टुळ यांची प्रबोधनात्मक भाष्य करणारी स्वराज्य ही सुप्रसिद्ध गेय कविता, युवा कवी सागर जाधव यांचे प्रेमगीत, रफिक इनामदार यांची तुपातली पोळी, सूर्यकांत नामूगडे यांची वय झालं म्हणून काय झालं, तसेच...

*कवितेच्या पारावर प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात संपन्न*

            महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून, कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात पार पडला.             हरवलेल्या रसिकांचा शोध घेत मनाला मनापासून साद घालत ठाणे, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व ताराराणी भोसले यांच्या खंबीर लढ्याचा ठाव घेत गीतं आणि कविता वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या गेल्या. पारावर जमलेल्या प्रत्येक कवीने स्वर व शब्दांच्या साथीने आपल्या कवितेत प्राण ओतला व रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजभान, वास्तवभान त्याबरोबरच बोलगाणी, गी...

*नवनगर शिक्षण मंडळाचे,सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी ,पुणे ३५,शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल.*

.           चि.ऋषिकेश घोलप,इयत्ता ५ वी. *निगडी*:- आज,शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी २०२४-२५ मधील  इयत्ता ५ वी व ८ वी या वर्गांच्या शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला.इयत्ता ५ वी चे २७ विद्यार्थी बसलेले होते त्यात ७ विद्यार्थी पात्र झालेत.त्यातील ३ विद्यार्थ्यांना २०० चे पुढे गुण मिळाले.१) कु.झीनत मुलानी:- २१० गुण,२) चि.ऋषिकेश घोलप:- २०८ गुण,३) कु.ललिता चौधरी:-२०४ गुण.या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन सौ.कल्पना उभे मॅडम,गणिताचे अध्यापन सौ.सविता पाटील मॅडम व सौ.रेश्मा बनसोडे मॅडम,इंग्रजीचे अध्यापन सौ.प्रतिमा काळे मॅडम,बुद्धिमत्ता चे अध्यापन श्री.काळूराम पवार सर व श्री.राहुल वांगेकर सर यांनी केले.यातील १)चि.ऋषिकेश घोलप व २) कु. झीनत मुलानी या दोन विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ५० पैकी ५० तर कु.श्रेया साठे या विद्यार्थिनीला ५० पैकी ४६ गुण मिळाले. इयत्ता ५ वी चा शिष्यवृत्तीचा २५.९३% निकाल लागला.         इयत्ता ८ वी चे ३९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते त्यातील १२ विद्यार्थी पात्र आहेत.तर १)कु.वैभवी शिं...

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते- उपप्रादेशिक अधिकारी सोनवणे

वार्ताहर (श्रीरामपुर)::   जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा  गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला . चालू शैक्षणिक  वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी राणी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी  याबद्दलचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो असे त्यांनी गौरवोद्गार काढले. शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धापरीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता य...

विचार हवा व्हायला

             आज जिकडे तिकडे स्पर्धा चालू आहे असे जाणवते म्हणजे १०१% ती चालूच आहे.पण,एकमेकांशी स्पर्धा करून काय साध्य करणार आहोत आपण?तोडा, फोडा आणि राज्य करा,अशी सगळीकडे परिस्थिती झालेली आहे.जी अवनिती/कुनिती इंग्रजांनी वापरली राज्य करण्यासाठी तीच अवनिती/ कूनिती आपण वापरतो,या जीवन वाटचाली का? आणि कशासाठी? हा ही मोठा यक्ष प्रश्न आहे?हे चित्र लवकरच बदलले पाहिजे.या पुढील चित्र तर फारच भयाण असणार आहे,तेव्हा यावर आताच विचार व्हायला हवा आणि त्यातून उपाय योजना ही.हे साहित्याच्या नावाखाली चालणारे बाजार थांबविले पाहिजे.आपल्या आपल्यात वाद लावून द्यायचे आणि त्यांनी स्वतःचा फायदा  करून घ्यायचा.दोन मांजरी आणि एका माकडाची गोष्ट ही आपणा सर्वांना परिचित आहेच.तीच अवस्था आपली आपणच करून घेतली आहे.         आपण स्वतःस साहित्यिक म्हणवितो आणि आपणच एकमेकांना किंमत,मान सन्मान देत नसेल तर काय उपयोग? कोणत्या तोंडाने स्वतःस साहित्यिक म्हणवून घेतो?आपल्या लेखणीचा आणि माणूस या पात्राशी काही संबंध उरतो का?एकीकडे मोठ्या रुबाबात म्हणायचे आम्ही व्यवसाय...